शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
5
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
6
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
7
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
8
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
9
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
10
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
11
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
12
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
13
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
14
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
15
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
16
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
17
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
18
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
19
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
20
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पस्थळीच वस्तीचे पुनर्वसन करा

By admin | Updated: May 31, 2014 23:28 IST

आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून

चव्हेलावासीयांची मागणी : कोसरी प्रकल्पातील बुडीत गावांचे प्रश्न सुटणार काय?वैरागड : आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत  कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा  सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून गाजावाजा करून सुरू आहे. परंतु सिंचन प्रकल्पाची अवस्था अतिशय बिकट आहे. ज्या कोसरी प्रकल्पाचे ३३ वर्षानंतर काम सुरू करण्यात आले. त्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायमच आहे, असे असतांनाही कोसरी प्रकल्पाचे काम सुरू करण्याची कल्पना कुणाची असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत. कोसरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये येणार्‍या चव्हेला गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याचे शासनाव्दारे प्रयत्न करण्यात आले. पण येथील नागरिकांनी पुनर्वसनाला स्पष्ट नकार दिला. ज्या प्रकल्पासाठी आम्हाला घरदार सोडावे लागणार आहे, या प्रकल्पाच्या पाण्यावरच इतर गावातील शेतकर्‍यांच्या जीवनात सुख येणार आहे. तर आम्ही बेघर कसे होणार या प्रकल्पाचे पाणी ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी आम्हाला जमीन देऊन पुनर्वसन करावे, अशी भावनिक साद नागरिक घालत आहेत.  परंतु नागरिकांचे पुनर्वसन न करताच कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम कुणाच्या डोक्यातील कल्पना आहे, असा प्रश्न चव्हेला व परिसरातील नागरिक करीत आहेत. कोसमी लघुपाटबंधारे योजनेमुळे ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तरीपण या भागातील नागरिक सांगतात की कोसरी प्रकल्पाजवळ असलेल्या मांगदा या गावाला सिंचनाचा कोणताच फायदा होणार नाही. मांगदा येथील संतोष वालोदे म्हणतात की, कोसरी प्रकल्पाची कल्पना कोणी आणि कशी साकार केली हे कळायला मार्ग नाही या प्रकल्पामुळे जवळच्या गावाला लाभ नाही. त्या प्रकल्पावर कोट्यवधी रूपये खर्च करून कोणता फायदा होणार.मानापूर, देलनवाडी आणि थोडाफार नागरवाही गावाचा भाग या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात येणार आहे. कोसरी प्रकल्पाबद्दल मांगदा, मानापूर, देलनवाडी येथील नागरिकांच्या अनुकूल प्रतिक्रीयाही नाही. या प्रकल्पामुळे या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. पण वनव्याप्त क्षेत्राची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे असे मत देलनवाडी येथील भामराज हष्रे यांनी व्यक्त केले.  सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. पुनर्वसन अन्यत्र ठिकाणी करण्याच्या विरोधात येथील नागरिक ठाम आहेत. (वार्ताहर)