शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

प्रकल्पस्थळीच वस्तीचे पुनर्वसन करा

By admin | Updated: May 31, 2014 23:28 IST

आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून

चव्हेलावासीयांची मागणी : कोसरी प्रकल्पातील बुडीत गावांचे प्रश्न सुटणार काय?वैरागड : आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत  कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा  सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून गाजावाजा करून सुरू आहे. परंतु सिंचन प्रकल्पाची अवस्था अतिशय बिकट आहे. ज्या कोसरी प्रकल्पाचे ३३ वर्षानंतर काम सुरू करण्यात आले. त्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायमच आहे, असे असतांनाही कोसरी प्रकल्पाचे काम सुरू करण्याची कल्पना कुणाची असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत. कोसरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये येणार्‍या चव्हेला गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याचे शासनाव्दारे प्रयत्न करण्यात आले. पण येथील नागरिकांनी पुनर्वसनाला स्पष्ट नकार दिला. ज्या प्रकल्पासाठी आम्हाला घरदार सोडावे लागणार आहे, या प्रकल्पाच्या पाण्यावरच इतर गावातील शेतकर्‍यांच्या जीवनात सुख येणार आहे. तर आम्ही बेघर कसे होणार या प्रकल्पाचे पाणी ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी आम्हाला जमीन देऊन पुनर्वसन करावे, अशी भावनिक साद नागरिक घालत आहेत.  परंतु नागरिकांचे पुनर्वसन न करताच कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम कुणाच्या डोक्यातील कल्पना आहे, असा प्रश्न चव्हेला व परिसरातील नागरिक करीत आहेत. कोसमी लघुपाटबंधारे योजनेमुळे ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तरीपण या भागातील नागरिक सांगतात की कोसरी प्रकल्पाजवळ असलेल्या मांगदा या गावाला सिंचनाचा कोणताच फायदा होणार नाही. मांगदा येथील संतोष वालोदे म्हणतात की, कोसरी प्रकल्पाची कल्पना कोणी आणि कशी साकार केली हे कळायला मार्ग नाही या प्रकल्पामुळे जवळच्या गावाला लाभ नाही. त्या प्रकल्पावर कोट्यवधी रूपये खर्च करून कोणता फायदा होणार.मानापूर, देलनवाडी आणि थोडाफार नागरवाही गावाचा भाग या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात येणार आहे. कोसरी प्रकल्पाबद्दल मांगदा, मानापूर, देलनवाडी येथील नागरिकांच्या अनुकूल प्रतिक्रीयाही नाही. या प्रकल्पामुळे या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. पण वनव्याप्त क्षेत्राची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे असे मत देलनवाडी येथील भामराज हष्रे यांनी व्यक्त केले.  सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. पुनर्वसन अन्यत्र ठिकाणी करण्याच्या विरोधात येथील नागरिक ठाम आहेत. (वार्ताहर)