शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सहा संचालकाचे सदस्यत्व रद्द उपनिबंधकाचा निर्णय

By admin | Updated: May 19, 2014 23:31 IST

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहा संचालकांचे पद जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी ९ मे रोजी रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

चामोर्शी बाजार समितीतील घटना

गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहा संचालकांचे पद जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी ९ मे रोजी रद्द करण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ (१) व नियम ४१ (३) अन्वये सेवा सहकारी संस्था मतदार संघ तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून बाजार समितीचे संचालक पदावर निवडून आलेले संचालकांना संचालक पद टिकवून ठेवण्याकरीता त्यांना सेवा सहकारी संस्थेचे तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य पदावर कायम राहणे आवश्यक असते. परंतु चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर बापुजी चापडे हे सेवा सहकारी संस्था कुनघाडाचे सदस्य असल्याने त्यांची बाजार समितीचे संचालक पदावर निवड झाली. परंतु पुढी कार्यकाळात सदस्यपदी ते निवडून आले नाहीत. तसेच मनोहर घुसाजी बामनकर हे सेवा सहकारी संस्था मार्र्कंडा कं. चे सदस्य असल्याने बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आले होते. पुढील कार्यकाळात सदस्य पदी निवडून आले नाहीत. अशोक तुकाराम धोडरे व लिलाबाई सुखदेव सातपुते हे अनुक्रमे चामोर्शी व भेंडाळा, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य असल्याने त्यांची बाजार समितीवर संचालक म्हणून निवड झाली होती. मात्र पुढील कार्यकाळात ते येथे निवडून आले नाही. त्यामुळे त्यांचेही सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जयेश आहेर यांनी ९ मे २०१४ रोजी घेतला आहे. वालसरा ग्रामपंचायतचे सदस्य असल्यामुळे केशव मसाजी भांडेकर व गिलगावचे ग्रामपंचायत सदस्य असल्याने होमराज दौलतशहा आलाम यांची ग्रामपंचायत मतदार संघातून बाजार समितीवर संचालक म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु हे दोनही संचालक पुढील कार्यकाळात ग्रा.पं.वर सदस्य म्हणून निवडून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचेही सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांच्याकडे या सहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी याचिका दाखल केली होती. या सहा संचालकांनी अ‍ॅड. वा. म. खेळकर यांच्या माध्यमातून युक्तीवाद करीत महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ चे कलम १३,१४,१५ मधील तरतूदीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळावर केवळ चारच प्रतिनिधी असतात. इतर सर्व संचालक हे केवळ शेतकरी असतात व याच अधिनियमाच्या कलम ४१ नुसार बाजार समितीचा संचालक असलेला शेतकरी ग्रामपंचायत किंवा सेवा सहकारी संस्थेत कार्यकाळ संपल्यावरही पदावर राहणार नाही, अशी कोणतीही तरतूद नसल्याचा युक्तीवाद केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वीराज प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक हा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. हा संदर्भ घेऊन वरील सहाही संचालकांतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद फेटाळून लावण्यात आला आहे व १५ मे २०१४ पासून वरील सहा संचालकांचे सदस्यत्वही कमी करण्यात आले, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी लेखी निवेदनातून दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)