शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रकमेच्या तगाद्याने रवीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 01:28 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील सपन नागेश शहा याच्याकडून १० महिन्यांपूर्वी १ लाख ९० हजार रूपयांचे पीकअप वाहन...

मृतकाच्या पत्नी व वडिलाचा आरोप : ठाणेदार व सपन शहा वर कारवाई करा एटापल्ली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील सपन नागेश शहा याच्याकडून १० महिन्यांपूर्वी १ लाख ९० हजार रूपयांचे पीकअप वाहन एटापल्ली तालुक्यातील कोंदावाही येथील रवी नामदेव सातपुते (२८) यांनी खरेदी केले होते. १ लाख रूपये नगदी देऊन ९० हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आले होते. गाडीच्या विम्याची रक्कम २२ हजार आपल्याकडे राहील, असे सपन शहा यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी २२ हजार रूपये देणार नाही, असे नंतर सांगितले. २२ हजार रूपयाची मागणी वारंवार केल्यावर सपन शहा यांनी रेगडीच्या ठाणेदाराची मदत घेऊन आपले पती रवी सातपुते यांना धमकावले. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करून आपला जीव दिला. त्यामुळे या प्रकरणात सपन शहा व कोटमीचे ठाणेदार यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतक रवीचे वडील नामदेव सातपुते व पत्नी गीता सातपुते यांनी केली आहे. या संदर्भात माहिती देताना गीता सातपुते व नामदेव सातपुते म्हणाले की, सपन शहा यांनी दोन महिन्यापूर्वी कोंदावाही येथे घरी चार व्यक्ती पैशासाठी पाठविले. त्यावेळी रवी घर नव्हता. त्यांनी मला पैसे लवकर द्या अन्यथा बघून घेऊ, अशी धमकी दिली होती, अशी माहिती गीता सातपुते यांनी दिली. तसेच सपन शहा यांनी रेगडीचे ठाणेदार माझे मित्र असून त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे. त्यामुळे तुमची काही खैर नाही, अशीही धमकी दिल्याचे रवीचे वडील नामदेव सातपुते यांनी सांगितले. कोटमीचे ठाणेदार वारंवार रवीला पोलीस ठाण्यात बोलाविण्याकरिता कोंदावाही येथे माणसे पाठवायचे. परंतु रवी बाहेरगावी कामासाठी गेल्याने ठाणेदारासोबत भेट झाली नाही. परंतु आठ दिवसापूर्वी मी व माझा लहान मुलगा संजय ठाणेदाराला कोटमी येथे जाऊन भेटलो. परंतु तुमच्या सोबत काम नाही, रवीलाच पाठवा, अशी दमदाटी करून आम्हाला वापास पाठविले, असा आरोप नामदेव सातपुते, जीवन सातपुते यांनी केला. ठाणेदार आपल्याला पोलीस ठाण्यात का बोलवित आहे. या भितीने व सपन शहाच्या वारंवारच्या धमकीमुळे आपला मुलगा रवी याने आत्महत्या केली. ठाणेदार व शहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सातपुते परिवाराने केली आहे. शवविच्छेदनापूर्वीच दिला प्रेताचा सुपूर्दनामा मंगळवारी ९ आॅगस्टला रवी सातपुते सकाळी १० वाजता घरून निघून गेले. घरच्यांनी शोध घेतला. रवीचे प्रेत दुसऱ्या दिवशी बुधवारी ७ वाजता शेताच्या बोडीत मिळाला. कोंदावाही पासून पाच किमी अंतरावर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी माहिती दिली. पोलिसांनी प्रेत आणण्यास सांगितले. रात्री ११ वाजता प्रेत ट्रॅक्टरने कोटमी येथे आणले. परंतु दुसऱ्या दिवशी आणा म्हणून ठाणेदाराने प्रेत वापस पाठविले. तिसऱ्या दिवशी गुरूवारला सकाळी ७ वाजता दुसऱ्यांदा प्रेत कोटमीला नेले. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाच तास प्रेत पोलीस ठाण्यात ठेवून एटापल्ली येथे पीएमला पाठविले. पीएम होण्यापूर्वीच ठाणेदारांनी प्रेताचा ताबापत्र दिले, अशी माहितीही नामदेव सातपुते यांनी दिली. मृतक नामदेव सातपुते व आपली यापूर्वी कधीच भेट झाली नाही. त्याच्या विरूध्द कोटमी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुध्दा नाही. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून दमदाटी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या दिवशी आपण धमकी दिली, असेल त्याच दिवशी आपल्या विरोधात का तक्रार केली नाही. रवीच्या मृत्यूबाबत मर्ग दाखल केला. आहे. त्याचा मृतदेह आणण्यासाठी आपण डिझेलचा खर्च व ड्रायव्हरला ५०० रूपये दिले. मृतदेह घरी परत नेण्यासाठी अगोदरच उशीर झाला होता. आणखी उशीर होऊन त्याच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, यासाठी अगोदरच सुपूर्दनामा लिहिला होता. सातपुते कुटुंबाला मदत केल्यानंतरही ते आपल्यावर असे आरोप का करीत आहे हे कळायला मार्ग नाही. त्यांनी लावलेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे आहेत. - निलेश पोळ, प्रभारी ठाणेदार, कोटमी