शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

विधी चिकित्सालय वादविवादांवरील रामबाण उपाय

By admin | Updated: May 3, 2017 01:31 IST

व्यक्ती शरिराला व्याधी झाल्यानंतर तत्काळ स्थानिक वैद्यकीय चिकित्साकडे जाऊन आपण उपचार घेतो

जिल्हा सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन : कोंढाळा येथे विधी सेवा चिकित्सालय केंद्राचा शुभारंभ देसाईगंज : व्यक्ती शरिराला व्याधी झाल्यानंतर तत्काळ स्थानिक वैद्यकीय चिकित्साकडे जाऊन आपण उपचार घेतो व व्याधी बरा करण्याचा प्रयत्न करतो. विधी सेवा चिकित्सालय हे सुध्दा वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी रामबाण उपाय ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले. देसाईगंज तालुका विधी सेवा व देसाईगंज बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायतमध्ये विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. के. जगदाळे, देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल, उपविभगीय अधिकारी दामोधर नान्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील किरण तुंभलवार, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वारजुरकर, अ‍ॅड. संजय गुरू, अ‍ॅड. ढोरे, अ‍ॅड. बुध्दे, अ‍ॅड. अविनाश नाकाडे, सरकारी अभियोक्ता फुले, अ‍ॅड. उईके, अ‍ॅड. मनिष शेंडे, अ‍ॅड. देशमुख, अ‍ॅड. सौदागर, लाँगमार्च खोब्रागडे, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे म्हणाले, शेजारी व गावातील व्यक्तीशी संबंधित असलेले फौजदारी अथवा दिवाणी स्वरूपाचे वादविवाद गावपातळीवरच निपटावे, न्यायालयाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे अनेक वर्ष वादी व प्रतिवादी यांना न्यायालयाची प्रतीक्षा करावी लागते, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी अ‍ॅड. बी. डब्ल्यू. पिलारे, छत्रपती ढोरे, धनराज मुंडले, रचना आवळे, राहूल रोकडे, गणेश रामटेके, विनोद उंदीरवाडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)