शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

डिझेलवाढीचे दर शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

कृषीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने अनेकजण यंत्राचा वापर करून शेती कसतात. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात हाेती. परंतु, बैल राखण्यासाठी ...

कृषीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने अनेकजण यंत्राचा वापर करून शेती कसतात. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात हाेती. परंतु, बैल राखण्यासाठी गुराखी मिळेना व बैलांच्या संगाेपनाचा प्रश्न यासारख्या समस्यांमुळे अनेकांनी बैलांची विक्री केली. केवळ दुग्ध उत्पादनासाठी अनेक शेतकरी गाई पाळतात. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून हंगामातील कामे ट्रॅक्टरने करीत आहेत. अनेक गावांत ट्रॅक्टरची संख्याही वाढली आहे. ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे. ट्रॅक्टरवर मजुरांनाही काम मिळाले आहे. कोंढाळा परिसरात धान लागवड भरपूर प्रमाणात केली जाते. परंतु, दरवर्षी काही ना काही संकट बळिराजासमोर येते. वैनगंगा नदीला आलेला पूर असो की येणारे वादळ आणि गारा पडल्याने धानाचे नुकसान असो, अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागताे. तरीसुद्धा शेतकरी न डगमगता शेती कसताे. मात्र, शेतीची मशागत, पीक लागवड, बी-बियाणे, रोवणीपासून कापणीपर्यंत पैसा खर्च करावा लागताे. सध्या डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे प्रती तासाचे भाडेही वाढले आहे. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येते.

काेट

शेतीसाठी लागणारी बियाणे, खेते व अन्य खर्चात वाढ झाली असली तरी शेतकऱ्याला शेती करावीच लागेल. शेतकरी शेती वाऱ्यावर साेडेल तर खाणार काय? बियाणे व खतांच्या वाढलेल्या किमती कशाप्रकारे कमी करता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करावे. तसेच राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून शेतातील संपूर्ण कामे केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा हाेईल आणि मजुरांना रोजगारसद्धा मिळेल.

शालिक बुराडे, शेतकरी काेंढाळा