शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

डिझेलवाढीचे दर शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

कृषीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने अनेकजण यंत्राचा वापर करून शेती कसतात. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात हाेती. परंतु, बैल राखण्यासाठी ...

कृषीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने अनेकजण यंत्राचा वापर करून शेती कसतात. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात हाेती. परंतु, बैल राखण्यासाठी गुराखी मिळेना व बैलांच्या संगाेपनाचा प्रश्न यासारख्या समस्यांमुळे अनेकांनी बैलांची विक्री केली. केवळ दुग्ध उत्पादनासाठी अनेक शेतकरी गाई पाळतात. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून हंगामातील कामे ट्रॅक्टरने करीत आहेत. अनेक गावांत ट्रॅक्टरची संख्याही वाढली आहे. ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे. ट्रॅक्टरवर मजुरांनाही काम मिळाले आहे. कोंढाळा परिसरात धान लागवड भरपूर प्रमाणात केली जाते. परंतु, दरवर्षी काही ना काही संकट बळिराजासमोर येते. वैनगंगा नदीला आलेला पूर असो की येणारे वादळ आणि गारा पडल्याने धानाचे नुकसान असो, अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागताे. तरीसुद्धा शेतकरी न डगमगता शेती कसताे. मात्र, शेतीची मशागत, पीक लागवड, बी-बियाणे, रोवणीपासून कापणीपर्यंत पैसा खर्च करावा लागताे. सध्या डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे प्रती तासाचे भाडेही वाढले आहे. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येते.

काेट

शेतीसाठी लागणारी बियाणे, खेते व अन्य खर्चात वाढ झाली असली तरी शेतकऱ्याला शेती करावीच लागेल. शेतकरी शेती वाऱ्यावर साेडेल तर खाणार काय? बियाणे व खतांच्या वाढलेल्या किमती कशाप्रकारे कमी करता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करावे. तसेच राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून शेतातील संपूर्ण कामे केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा हाेईल आणि मजुरांना रोजगारसद्धा मिळेल.

शालिक बुराडे, शेतकरी काेंढाळा