शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात लावलेली रोपे नष्ट

By admin | Updated: October 18, 2014 01:30 IST

युती शासनाच्या काळात मोठा गाजावाजा करून झुनकाभाकर योजना सुरू करण्यात आली होती. महसूल विभागाने केंद्र उभारण्यासाठी गावागावात जागा उपलब्ध करून दिली.

वैरागड : युती शासनाच्या काळात मोठा गाजावाजा करून झुनकाभाकर योजना सुरू करण्यात आली होती. महसूल विभागाने केंद्र उभारण्यासाठी गावागावात जागा उपलब्ध करून दिली. मात्र दोन वर्षातच सदर योजना गुंडाळावी लागली होती. कमी पैशात भुकेल्यांना अन्न मिळावे हा तत्कालीन सरकारचा उद्देश प्रामाणिक होता. परंतु योजना राबविणारे हात गढूळ असल्याने सदर योजनेचा बट्याबोळ झाला. सदर योजनेचा प्रत्यय मागील तीन वर्षापासून राज्यात राबविल्या जाणाऱ्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या रूपात आला आहे. वैरागड येथे पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा तिनदा झाडे लावण्यात आली. परंतु सदर रोपटे अल्पवधीतच नष्ट झाली. त्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजना ुफसवी असल्याचे दिसून आले आहे.शतकोटी वृक्ष लागवड योजनेची असफलता बघता, सदर योजना आजमितीला सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. २०११ पासून सुरू करण्यात आलेली शेतकोटी वृक्ष लावगड योजना जिल्ह्यात फारशा प्रमाणात परिणामकारक ठरू शकली नाही. जिल्ह्यातील योजनेचे सत्य आता बाहेर पडू लागले आहे. शाळेमधून हरितसेनेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी केलेल्या तपासणीत निम्म्याहून अधिक वृक्ष मृत झाल्याचे दिसून आले आहे. मागील तीन वर्षात प्रशासकीय यंत्रणेने प्रामाणिकपणे काम न केल्याचा परिणाम सदर योजनेवर झाला आहे. पहिल्या वर्षात लावलेली रोपटे जगली नाहीत, म्हणून त्याच ठिकाणी दुसऱ्या वर्षी वृक्ष लागवड करण्यात आली. तरीही दुसऱ्यांदा लावलेली रोपटे अल्पावधीतच मृतप्राय झाली. शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या यशस्वीतेचा बागुलबुवा करण्यासाठी तेवढाच निधी खर्च करून तिसऱ्यांदा झाडे लावण्यात आली. परंतु या योजनेत भरपूर प्रमाणात पैसे असल्याने काही विशिष्ट लोकांचेच खिसे गरम करण्याचे काम सदर योजनेच्या माध्यमातून झाले आहे, असा आरोप अनेक ग्रामीण स्तरावरील लोकांकडून होत आहे. जिल्हा वनव्याप्त असतानाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सदर योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे या योजनेची खरच गरज होती काय, असाही प्रश्न उपस्थित होते आहे. अनेक रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. त्या ठिकाणी आधिच जंगल होते. छोट्या रोपांच्या संरक्षणासाठी मोठ्या वृक्षांची तोड करून कुंपण करण्यात आले. रोपांच्या संरक्षणासाठी नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली. रोपही नष्ट झाले. त्यामुळे या योजनेतून काय साध्य झाले, असाही प्रश्न निर्माण होत आहे. (वार्ताहर)