शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
4
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
5
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
6
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
7
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
8
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
9
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
10
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
11
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
12
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
13
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
14
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
15
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
16
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
17
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
18
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
19
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
20
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा

पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:12 IST

तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले.

ठळक मुद्देगडगडाट आणि कडकडाटाने उडाला थरकाप : उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, पेरणीला येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. वरुणराजाचे हे वाजतगाजत झालेले आगमन काही वेळासाठी जीवाचा थरकाप उडविणारे असले तरी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे. आता पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होते. समाधानकारक पाऊस पडताच पेरण्यांना सुरूवात होते. यावर्षी मात्र पावसाने चांगलीच दडी मारली होती. १५ दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस झाला. मात्र पेरणीसाठी पुरेसा ओलावा जमिनीत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या केल्यानंतर ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशाच शेतकºयांनी धानाचे पºहे भरले. मात्र ९५ टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी पºहे व इतर पिकांची पेरणी केली नाही. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतिक्षेत होता. उन्हाळ्याप्रमाणे दिवसा कडक ऊन पडत असल्याने उकाड्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते.शुक्रवारी पहाटे ३ आणि सायंकाळी ५ वाजतानंतर दमदार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाऊस बरसत होता. त्यानंतरही रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकºयांनी याआधीच बियाणे व खते खरेदी करून ठेवली. कर्ज घेण्यासाठीही शेतकºयांची लगबग मागील काही दिवसांपासून वाढली आहे.जिल्हाभरातील मामा तलाव अजुनही कोरडे ठाकचगडचिरोली जिल्ह्यात दिना जलाशय व येंगलखेडा प्रकल्प आहे. दिना जलाशयात उपयुक्त जलसाठा काहीच नाही. तर येंगलखेडा प्रकल्पात २७.०६ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणात १६.४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. सती, वैनगंगा, गाढवी, कठाणी, खोब्रागडी, प्राणहिता या नद्यांची पातळीही अतिशय कमी आहे. जिल्हाभरातील मामा तलाव अजुनही कोरडेठाकच आहेत.अपेक्षित पावसाच्या केवळ २४ टक्केचहवामान खात्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २८ जूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात १८९.७ मिमी पाऊस पडणे आवश्यक होता. मात्र प्रत्यक्षात यावर्षी केवळ २५.५ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी २८ जूनपर्यंत सुमारे २१८ मिमी पाऊस झाला होता. सर्वच तालुक्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस झाला आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात गडचिरोली तालुक्यात १६.३, कुरखेडा २४.९, आरमोरी २४.५, चामोर्शी ०.७, सिरोंचा ०.१, अहेरी ०.३, धानोरा ४.५, कोरची २२.९, देसाईगंज ९.७, मुलचेरा १.३, भामरागड १३.८ मिमी पाऊस पडला आहे.उशीरा पेरणी झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा अनुभव शेतकºयांना असल्याने यावर्षी उत्पादनात घट होईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाअभावी जिल्हाभरातील धान रोवणीची कामेही लांबणार आहेत.