शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:12 IST

तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले.

ठळक मुद्देगडगडाट आणि कडकडाटाने उडाला थरकाप : उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, पेरणीला येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. वरुणराजाचे हे वाजतगाजत झालेले आगमन काही वेळासाठी जीवाचा थरकाप उडविणारे असले तरी त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे. आता पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होते. समाधानकारक पाऊस पडताच पेरण्यांना सुरूवात होते. यावर्षी मात्र पावसाने चांगलीच दडी मारली होती. १५ दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस झाला. मात्र पेरणीसाठी पुरेसा ओलावा जमिनीत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या केल्यानंतर ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशाच शेतकºयांनी धानाचे पºहे भरले. मात्र ९५ टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी पºहे व इतर पिकांची पेरणी केली नाही. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतिक्षेत होता. उन्हाळ्याप्रमाणे दिवसा कडक ऊन पडत असल्याने उकाड्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते.शुक्रवारी पहाटे ३ आणि सायंकाळी ५ वाजतानंतर दमदार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाऊस बरसत होता. त्यानंतरही रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकºयांनी याआधीच बियाणे व खते खरेदी करून ठेवली. कर्ज घेण्यासाठीही शेतकºयांची लगबग मागील काही दिवसांपासून वाढली आहे.जिल्हाभरातील मामा तलाव अजुनही कोरडे ठाकचगडचिरोली जिल्ह्यात दिना जलाशय व येंगलखेडा प्रकल्प आहे. दिना जलाशयात उपयुक्त जलसाठा काहीच नाही. तर येंगलखेडा प्रकल्पात २७.०६ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणात १६.४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. सती, वैनगंगा, गाढवी, कठाणी, खोब्रागडी, प्राणहिता या नद्यांची पातळीही अतिशय कमी आहे. जिल्हाभरातील मामा तलाव अजुनही कोरडेठाकच आहेत.अपेक्षित पावसाच्या केवळ २४ टक्केचहवामान खात्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २८ जूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात १८९.७ मिमी पाऊस पडणे आवश्यक होता. मात्र प्रत्यक्षात यावर्षी केवळ २५.५ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी २८ जूनपर्यंत सुमारे २१८ मिमी पाऊस झाला होता. सर्वच तालुक्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस झाला आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात गडचिरोली तालुक्यात १६.३, कुरखेडा २४.९, आरमोरी २४.५, चामोर्शी ०.७, सिरोंचा ०.१, अहेरी ०.३, धानोरा ४.५, कोरची २२.९, देसाईगंज ९.७, मुलचेरा १.३, भामरागड १३.८ मिमी पाऊस पडला आहे.उशीरा पेरणी झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा अनुभव शेतकºयांना असल्याने यावर्षी उत्पादनात घट होईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाअभावी जिल्हाभरातील धान रोवणीची कामेही लांबणार आहेत.