शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रानगवा व चितळाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:01 IST

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगवा व चितळाला गावठी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना जंगलात सुरक्षित सोडले. सदर घटना शनिवारी सकाळी आलापल्ली गावाजवळ घडली.

ठळक मुद्देजंगलात सोडले : कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगवा व चितळाला गावठी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना जंगलात सुरक्षित सोडले. सदर घटना शनिवारी सकाळी आलापल्ली गावाजवळ घडली.मादी रानगवा व चितळ अन्न व पाण्याच्या शोधात आलापल्ली गावाजवळ आले. गावठी कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. ही बाब आलापल्ली येथील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आलापल्ली, अहेरी परिक्षेत्र व वन्यजीव संरक्षण पथकामधील वनकर्मचाºयांच्या दोन टिम तयार करण्यात आल्या. काही वेळातच चितळ व रानगवा यांना पकडण्यात आले. नागेपल्ली येथील पशु रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जंगलात सोडण्यात आले.सदर कार्यवाही आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या नेतृत्त्वात वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यनारायण आत्राम, आलापल्लीचे क्षेत्र सहाय्यक योगेश शेरेकर, वनपाल सदानंद बावणे, सचिन धात्रक, वनरक्षक प्रदीप गेडाम, दयानंद चिव्हाणे, वनमजूर बंडू रामगीरकर, कांबळे, मलगाम, श्रीनिवास गंजीवार, इस्माईल शेख, रूपेश बोरेवार यांनी पार पाडली.