शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वीज पोहोचण्यापूर्वी विसोऱ्यात ६० वर्षांपूर्वी पोहोचले होते रेडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:01 IST

गावात माेेबाईल व टीव्ही ही साधने पाेहाेचण्यापूर्वी जनसंवादासाठी रेडिओ हे एकमेव दृकश्राव्य माध्यम हाेते. नागपूरच्या व्यक्तीने बाेललेला आवाज आपल्या घरात ऐकू येणे, हे एक कुतूहलच वाटत हाेते. त्यामुळे रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी दिवसभर परशुरामकर यांच्या घरी वर्दळ राहात हाेती. सन १९६० च्या दरम्यानचे रेडिओ बॅटरीवर चालणारे होते. त्यामुळे त्याला विजेची गरज पडत नव्हती.

ठळक मुद्देआज जागतिक रेडिओ दिन

अतुल बुराडेलाेकमत न्यूज नेटवर्कविसोरा : मनोरंजसाठी गाणी ऐकणे, जगाची खबर जाणून घेण्यासाठी बातम्या ऐकणे यासाठी अर्धशतकापूर्वीच्या काळात रेडिओ हे एकमेव साधन होते. ज्यांच्याकडे रेडिओ आहे ते लोक श्रीमंत म्हणून गणल्या जात. अरण्यपट्ट्यात वसलेल्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा या गावात आजही त्या काळातील रेडिओच्या आठवणी जाग्या करणाऱ्या व्यक्ती आहेत. आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी १९६० मध्ये या गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्धव परशुरामकर यांनी चंद्रपूर येथून रेडिओ विकत घेऊन आणला होता. या भागातील तो पहिला रेडिओ होता.गावात माेेबाईल व टीव्ही ही साधने पाेहाेचण्यापूर्वी जनसंवादासाठी रेडिओ हे एकमेव दृकश्राव्य माध्यम हाेते. नागपूरच्या व्यक्तीने बाेललेला आवाज आपल्या घरात ऐकू येणे, हे एक कुतूहलच वाटत हाेते. त्यामुळे रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी दिवसभर परशुरामकर यांच्या घरी वर्दळ राहात हाेती. सन १९६० च्या दरम्यानचे रेडिओ बॅटरीवर चालणारे होते. त्यामुळे त्याला विजेची गरज पडत नव्हती.या रेडिओवर नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ऐकले जात होते. विशेष बाब म्हणजे, तब्बल ६० वर्षांपूर्वी विसोरात जेव्हा पहिला रेडिओ आला, तेव्हा गावात वीजसुद्धा आलेली नव्हती. सन १९६४ ला विसोरात वीज पाेहाेचली. रेडिओ दाखल झाले, त्यावेळी गावामध्ये टीव्हीचा पत्ता नव्हता. म्हणजेच परशुरामकर यांनी आणलेला रेडिओ विसोरातले पहिलावहिले प्रसारमाध्यम होते. त्यामुळे रेडिओची प्रचंड क्रेझ होती. गावामध्ये रेडिओ ऐकण्यास सकाळपासून वीस-पंचवीस लोकांची सतत गर्दी असायची. त्यानंतर, फिलिप्स, मर्फी, नेल्को या कंपनींचे रेडिओ विसोरा येथे आणल्या गेले. रेडिओ आगमनाच्या पूर्वी गावातील कुणी शहराच्या ठिकाणी शिकत असेल वा जात असेल, तो व्यक्ती  गावात आल्यावर वाचून-ऐकून देशातील, जगातील घटनांची माहिती देत असे. तेव्हा रेडिओच्या बॉक्समधून आवाज ऐकू येणे हे आश्चर्यच होते. म्हणूनच रेडिओ ऐकण्यास लोकांची गर्दी व्हायची. विसोरा येथील काही धनाढ्य लोक माेठ्या शहरांत नेहमी जात, त्यामुळे त्यांना बाजारात येणाऱ्या नवनव्या वस्तूंची माहिती हाेत असे.

टीव्ही, माेबाइलने घेतली रेडिओची जागा२० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात माेबाइल पाेहाेचला नव्हता, तर टीव्ही घेणे सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नव्हते, तसेच गावात असलेला टीव्ही अँटिनावर चालविला जात असल्याने या टीव्हीवर दूरदर्शन हे एकच चॅनल दिसत हाेते. परिणामी, सर्वसामान्य व्यक्ती रेडिओच खरेदी करीत हाेेता. मात्र, डीटीएच सेवा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यानंतर अनेक चॅनल दिसायला लागले, तसेच टीव्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा हाेऊन टीव्हीच्या किमती सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात आल्याने नागरिक टीव्ही खरेदी करायला लागले. त्यानंतर, आलेल्या स्मार्ट माेबाइलवर साेशल मीडियाचा विस्तार हाेऊन नागरिक रेडिओला विसरत आहेत.

 

टॅग्स :electricityवीज