शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

ओलाव्याअभावी रबीच्या पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: November 11, 2014 22:39 IST

मागील दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रबीच्या पेरण्या रखडल्या असून ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

गडचिरोली : मागील दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रबीच्या पेरण्या रखडल्या असून ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पेरणीसाठी शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रमुख पीक म्हणून धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही. असे शेतकरी रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, लाखोळी, मुग, मसुर, तुर, पोपट, उडीद, वाटाणा, वाल, बरबटी, कुरता आदी पिकांचे उत्पादन घेतले जातात. ही सर्व पिके अत्यंत कमी पाण्यात होत असल्याने या पिकांसाठी स्वतंत्र जलसिंचनाची आवश्यकता भासत नाही. परिणामी शेतकरी या पिकांचे उत्पादन कोरडवाहू शेतीत घेतात. सिंचनाची आवश्यकता नसली तरी बियाणे उगविण्यासाठी जमिनीमध्ये काही प्रमाणात ओलावा असणे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी शेत तयार करण्याच्या कामाला आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरूवात होते. मात्र यावर्षी पावसाने सप्टेंबर महिन्यापासूनच कायमची हुलकावनी दिली. त्यामुळे जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावाच नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून पावसाची प्रतीक्षा सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी मात्र पेरणी केली आहे. कृषी विभागाने यावर्षी ४० हजार ५७० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आवश्यक असलेली संकरित बि- बियाणे, खते तसेच किटकनाशके उपलब्ध करून दिली आहेत. नियोजनाच्या एकुण क्षेत्रापैकी केवळ २ हजार ८७६ हेक्टरवर ५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी झाली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने बियाणे उगवणार नाही. या भीतीपोटी शेतकरी पेरणी करण्यास धजावत नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रब्बी हंकामामध्ये जवळपास २० टक्के वाटा लाखोळी पिकाचा आहे. लाखोळीचे पीक धानपिक निघण्याच्या पंधरा दिवसांपूर्वी टाकल्या जाते. जड धान निघण्यास अजुन पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लाखोळीची पेरणी अजुनपर्यंत केली नाही. केवळ मध्यम धानाच्या क्षेत्रात लाखोळीची लागवड करण्यात आली आहे. मुग, मसुर, तुर, पोपट, उळीद, वाटाणा, बरबटी, कुरता या कडधान्य पिकांची पेरणीसाठी कृषी विभागाने २९ हजार ३४० हेक्टरचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात मात्र १ हजार ४२९.८ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तर ज्वारी पिकाची पेरणीही केवळ ३३९ हेक्टरवर झाली आहे.