शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जांभळी रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST

रांगी : येथून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभळी गावाकडे जाणाऱ्या सहा किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण झाले नसल्याने ...

रांगी : येथून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभळी गावाकडे जाणाऱ्या सहा किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण झाले नसल्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

जांभळी गावाचा समावेश आरमोरी तालुक्यात होतो. येथील नागरिकांनी नियमित रांगी येथे दैनंदिन कामाकरिता येत असतात. कधी आठवडी बाजार तर कधी बँकेचे काम नागरिकांना असते. याशिवाय शाळा-महाविद्यालय व अन्य कामाकरिता विद्यार्थीही नियमित येतात. विशेष म्हणजे, या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी खडीकरणाचे काम करण्यात आले. त्यानंतर काही वर्षात रस्ता पूर्ण उखडला. येथे मुरूम टाकणे आवश्यक होते; परंतु याकडे दुर्लक्ष झाले. सदर मार्ग वर्दळीचा असल्याने डांबरीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

जांभळीकडे जाणाऱ्या सहा किमी मार्गाचे डांबरीकरण झाल्यास परिसरातील नागरिकांना रांगीकडे ये-जा करणे सोयीचे होऊ शकते. पावसाळ्यात सदर रस्त्यावरून चिखल पसरतो. त्यामुळे आवागमन करताना अडचणी येतात. जागोजागी गिट्टी उखडली असल्याने दुचाकी वाहने पंक्चर होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सहा किमी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी जांभळीवासीयांनी अनेकदा केली; परंतु दुर्लक्षच झाले.