शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

नान्ही व आंधळीतील धान खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:19 IST

धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे.

ठळक मुद्देसाठवणूक क्षमता संपली : धानाची उचलच नाही; अवकाळी पाऊस आल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली असून खरेदी केलेल्या मालाची तत्काळ उचल करून गोदाम रिकामा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उघड्यावर धान ठेवल्याने वेळेवर पाऊस आल्यास धान भिजून मोठ्या प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाचे यापूर्वी नुकसान झाले आहे. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी ज्या संस्थेकडे धान साठवणूक करण्यासाठी गोदामाची व्यवस्था आहे किंवा संस्थेच्या प्रांगणात ओट्याचे बांधकाम केले आहे. अशा संस्थांनाच धान खरेदीची परवानगी दिली आहे.नान्ही व आंधळी येथील संस्थांकडे गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे या संस्थांनी ओट्याचे बांधकाम करून खरेदी सुरू केली. दोन्ही संस्थांनी प्रत्येकी जवळपास पाच हजार क्विंटल धान खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने भरडाईसाठी उचल केली नाही. त्यामुळे सदर धान खरेदी केंद्राच्या आवारातच ताडपत्री झाकून पडून आहे. ओट्याचीही साठवणूक क्षमता संपल्याने धान खरेदी करू नये, अशा सूूचना आदिवासी विकास महामंडळाने संस्थेला दिल्या असल्याने या सूचनांनुसार संस्थेने मागील आठवडाभरापासून धान खरेदी बंद पडली आहे. शेतकऱ्यांच्या धानाची मळणी पूर्ण झाली आहे. खरीपासाठी घेतलेले कर्ज मार्च महिन्याच्यापूर्वी परत करावे लागणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धान आणण्यास सुरूवात केली आहे. मात्र धान खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे धान वजन न करताच ठेवले जात आहे. वेळेवर पाऊस आल्यास धानाची मोठी नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.हजारो क्विंटल धान उघड्यावरगोदाम नसल्याने नान्ही व आंधळी या दोन्ही संस्थांनी धान खरेदी आठवडाभरापासून बंद ठेवली आहे. मात्र याची माहिती ग्रामीण भागातील शेतकºयांना नाही. त्यामुळे शेतकरी बैैलबंडीने धान खरेदी केंद्रावर आणत आहेत. मागील आठ दिवसांत हजारो क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने धानाची उचल करून ओटे मोकळे करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.