शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी जनजागृती

By admin | Updated: June 30, 2016 01:37 IST

दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी ठिकठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे.

एटापल्लीत मोटारसायकल रॅली : मानापुरात मार्गदर्शन कार्यक्रमएटापल्ली/मानापूर/देलनवाडी : दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी ठिकठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे. या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता एटापल्ली येथे मोटारसायकल रॅली तर मानापूर येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एटापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी एच. जी. मडावी यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचाऱ्यांनी वन परिक्षेत्र कार्यालयापासून मोटारसायकल रॅली काढली. यावेळी एटापल्ली, टोला, जीवनगट्टा, कृष्णार आदी गावांतून फिरविण्यात आली. वन परिक्षेत्र कसनसूर अंतर्गत १ हजार झाडे लावण्याची उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने लोकसहभागातून खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात आले. कसनसूर, रोपी, कसूरवाही, हनपायली, सरखेडा, दिंडवी, पैडी आदी गावांमध्ये खड्डे खोदण्यात आले. परंतु वृक्ष लागवड झाल्यानंतर वृक्ष संवर्धनाकरिता संरक्षक कठडे लावण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे तालुक्यात लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जीवंत राहणार, ही चिंतेची बाब आहे. देलनवाडी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत गावागावांत ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तांडे, पाडे, वस्त्यांमध्ये वृक्ष लागवडीबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. वृक्ष लागवड जनजागृती करण्याच्या हेतूने मानापूर येथे विवेकानंद विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनपाल मसराम, सावसाकडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून वृक्ष लागवड कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)