शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१५ शाळांमध्ये हंगामी वसतिगृह

By admin | Updated: November 23, 2015 01:11 IST

कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हाभरात १५ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले आहेत. ...

५९६ विद्यार्थ्यांची व्यवस्था : रोजगारासाठी स्थलांतरित होत असलेल्यांच्या पाल्यांना लाभदिगांबर जवादे गडचिरोलीकामासाठी स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हाभरात १५ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले आहेत. या वसतिगृहात ५९६ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास फार मोठी मदत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास जुलै ते नोव्हेंबर या महिन्यापर्यंत रोजगार मिळतो. त्यानंतर मात्र रोजगार मिळणे बंद होते. परिणामी बहुतांश शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी रोजगारासाठी नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात किंवा तेलंगणा, छत्तीसगड राज्यात रोजगारासाठी जातात. पालक रोजगारासाठी गेल्यानंतर पाल्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पाल्यांनाही सोबत नेले जाते. परिणामी सदर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यालाही कष्टप्रद जीवन कंटावे लागते. अनेक दिवस शाळेपासून खंड पडल्यामुळे कधीकधी विद्यार्थी कायमची शाळा सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थलांतरीत होणाऱ्या पालकांसाठी दरवर्षी हंगामी वसतिगृह निर्माण केले जातात. यावर्षी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात ३२ शाळांमध्ये हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या शाळांमध्ये वसतिगृह सुरू करता आले नाही. १५ ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यास सर्व शिक्षा अभियान विभागाने मान्यता दिली आहे.यामध्ये कुरखेडा तालुक्यात एक, धानोरा एक, चामोर्शी एक, अहेरी तालुक्यात सात व एटापल्ली तालुक्यात पाच ठिकाणी वसतिगृह सुरू केले जाणार आहेत.सदर वसतिगृह नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीपर्यंत चालविले जाणार आहेत. हे वसतिगृह चालविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे. या हंगामासाठी प्रती विद्यार्थी ८ हजार २०० रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थ्याला मिळणार या सुविधाहंगामी वसतिगृहाची संकल्पना राबविताना यापूर्वी शाळेलाच वसतिगृह बनविण्यात येत होते. मात्र बरेचशे विद्यार्थी शाळेमध्ये राहण्यासाठी तयार होत नाही. आई-वडील गेले तरी आजी-आजोबा, वडीलधारी मंडळी घरी राहतात. त्यांच्याकडेच विद्यार्थी राहण्यास पसंती दर्शवित असल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर यावर्षीपासून पहिल्यांदाच हंगामी वसतिगृहाची संकल्पना राबविताना सदर विद्यार्थी त्याच्या आजीआजोबाकडे राहिल्यासही त्याला वसतिगृहाच्या सुविधांचा लाभ दिला जाईल. त्याला रात्रीचे जेवन, सकाळचा नास्ता पुरविण्यात येईल. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत दुपारच्या जेवनाची सोय करता येईल. त्या विद्यार्थ्याला स्टेशनी, ब्रश, पेस्ट, साबन, तेल, कंगवाही पुरविण्यात येणार आहे. गळती कमी होण्यास होणार मदतआई-वडील रोजगारासाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्यासोबत पाल्यही जात असल्याने कित्येक शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत होत्या. शाळेमध्ये खंड पडल्याने कित्येक विद्यार्थी शाळेत येण्यास तयारही होत नव्हते. परिणामी शाळा सोडून देत होते. हंगामी वसतिगृहाच्या सोयीमुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. त्यामुळे आई-वडील गेले तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होत नाही. याचे सकारात्मक परिणाम मागील वर्षी दिसून आले आहेत. त्यामुळेच यावर्षीसुध्दा सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.