शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

दुबार पेरणीसाठी बियाणे पुरवा

By admin | Updated: July 16, 2016 01:44 IST

७ ते १३ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस बरसला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

नुकसान भरपाई द्या : भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे गडचिरोली : ७ ते १३ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस बरसला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच पाळे व पऱ्ह्यांचेही नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने बियाणे पुरवून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात भाजपच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांना निवेदन देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन- चार वर्षांपासून सतत दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढवले. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करावे, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना मनोज आखाडे, मनमोहन बंडावार, जनार्धन साखरे, बापू करमे, अनिल कुनघाडकर, युवराज बोरकुट यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)