शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा ...

गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, राज्य सरकारी सेवेतील ग्रामसेवक, आराेग्य, शिक्षक, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व ग्रामसेवक युनियनने केली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २२ एप्रिल राेजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून काेराेना महामारीच्या संकटाला ताेंड देत महाराष्ट्रातील अनेक गावे, खेडे, वाड्या सुरक्षित ठेवण्यासाठी गावातील विविध विकास समित्यांच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांना साेबत घेऊन सरपंच, ग्रामसेवक, आराेग्य कर्मचारी, पाेलीस, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काेराेनाविरुद्धच्या लढाईत स्वत:ला झाेकून दिले. गृहभेटी, रुग्ण सर्वेक्षण, विलगीकरण, चेकपाेस्ट, मास्क वापर, सॅनिटायझर, फवारणी, निर्जंतुकीकरण, पररजिल्ह्यातून आलेल्या निराधार, गरजू, गरीब कुटुंबांना निवास, भाेजन व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण देशात लाॅकडाऊनद्वारे बंद असताना तसेच अनेक शासकीय खासगी क्षेत्रामध्ये वर्क फ्राम हाेम सुरू असताना गावपातळीवरील या मंडळींनी जिवाची काेणतीही पर्वा न करता काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत आहेत. असे काम करतानाच गडचिराेली जिल्ह्यात ग्रामसेवक, शिक्षक, पशुधन पर्यवेक्षक व इतर कर्मचारी मिळून सात जणांना काेराेनामुळे मृत्यू झाला. अशा काेराेना याेद्धांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनावर जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांची स्वाक्षरी असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांना निवेदन पाठविले आहे.