शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

१ मे महाराष्ट्र दिनी रात्री आरमोरी तालुक्यात मेघगर्जनेसह चक्रीवादळ व गारपिटीसह वादळी पाऊस आला. या पावसाने आरमोरी, अरसोडा, रवी, ...

१ मे महाराष्ट्र दिनी रात्री आरमोरी तालुक्यात मेघगर्जनेसह चक्रीवादळ व गारपिटीसह वादळी पाऊस आला. या पावसाने आरमोरी, अरसोडा, रवी, मुलूरचक, जोगीसाखरा, पळसगाव, शंकरनगर, रामपूर, कनेरी व इतर भागांतील उन्हाळी धान, मका, आंबा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. आरमोरी तालुक्यातील विविध भागातील उभे व अंतिम टप्प्यात कापणीच्या स्थितीत आलेले धान पीक वादळी पावसाने जमिनीला टेकले असल्याने पिकाची नासाडी झाली. तसेच मका पिकाचेही नुकसान झाले. आंबा व इतर फळपिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक घरावरची कवेलू व छप्पर उडाले. नुकसान झालेल्या अरसोडा, रवी व मुलूरचक भागाला भेट देऊन काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी नुकसानीची पाहणी केली. वादळ व गारपिटीसह आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने परिसरातील ाशेतकरीही धास्तावले आहेत. सुरू असलेल्या संकटाच्या मालिकेने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत शालिक पत्रे व अनेक शेतकरी उपस्थित होते.