शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

केंद्र सरकारविरोधात काळा दिवस पाळून आरमोरीत निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:39 IST

शेतकरी आंदोलनात आजपर्यंत ५०० च्यावर शेतकरी शहीद झाले, तरीही केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. केंद्र सरकारच्या ...

शेतकरी आंदोलनात आजपर्यंत ५०० च्यावर शेतकरी शहीद झाले, तरीही केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरी शेतमजूर, कामगार विरोधी धोरणाविरोधात शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, विद्यार्थी युवक यांच्या व इतर संघटनांनी २६ मे रोजी काळा दिवस पाळून आपल्या घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकार विरोधात देशव्यापी निषेध दिन पाळण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केले होते. या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटकच्यावतीने आरमोरी येथे काळे झेंडे दाखवून निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध नाेंदविला व विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदारामार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविले.

आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय परिषद सदस्य डॉ. महेश कोपुलवार, आयटकचे अध्यक्ष तथा भाकपाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, आयटकचे जिल्हा सचिव जगदीश मेश्राम, नगरसेविका सिंधू कापकर, महिला फेडरेशनच्या मीनाक्षी सेलोकर, सुरेश सोनटक्के, प्रशांत खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, अमोल दामले, स्वप्नील राऊत, अक्षय भोयर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

बाॅक्स

खतांच्या किमती वाढवून कार्पाेरेटला अनुदान दिल्याचा आराेप

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मे ला सहा महिने पूर्ण झाले तसेच कामगारांच्या आंदोलनालासुद्धा सहा महिने पूर्ण होत आहेत. २६ मे २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शपथ घेतली हाेती. या घटनेलासुद्धा सात वर्षे पूर्ण झाली. या सात वर्षात सरकारने शेतकरी, शेतमजूर व कामगारांना देशोधडीला लावले. केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवून पुन्हा कार्पोरेट कंपन्यांना चौदा हजार कोटींचे अनुदान दिले आणि आता पुन्हा खेळी खेळून खताच्या किमती पूर्ववत करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे नाटकही करीत आहेत. कोराेना महामारी देशात आणण्यासाठी केंद्र सरकारचे बेजबाबदार धोरण कारणीभूत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केला.

===Photopath===

260521\26gad_4_26052021_30.jpg

===Caption===

काळे झेंडे दाखवून केंद्र शासनाचा निषेध करताना संघर्ष समितीचे कार्यकर्ते.