शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

केंद्र सरकारविरोधात काळा दिवस पाळून आरमोरीत निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:39 IST

शेतकरी आंदोलनात आजपर्यंत ५०० च्यावर शेतकरी शहीद झाले, तरीही केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. केंद्र सरकारच्या ...

शेतकरी आंदोलनात आजपर्यंत ५०० च्यावर शेतकरी शहीद झाले, तरीही केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरी शेतमजूर, कामगार विरोधी धोरणाविरोधात शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, विद्यार्थी युवक यांच्या व इतर संघटनांनी २६ मे रोजी काळा दिवस पाळून आपल्या घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकार विरोधात देशव्यापी निषेध दिन पाळण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केले होते. या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटकच्यावतीने आरमोरी येथे काळे झेंडे दाखवून निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध नाेंदविला व विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदारामार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविले.

आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय परिषद सदस्य डॉ. महेश कोपुलवार, आयटकचे अध्यक्ष तथा भाकपाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, आयटकचे जिल्हा सचिव जगदीश मेश्राम, नगरसेविका सिंधू कापकर, महिला फेडरेशनच्या मीनाक्षी सेलोकर, सुरेश सोनटक्के, प्रशांत खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, अमोल दामले, स्वप्नील राऊत, अक्षय भोयर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

बाॅक्स

खतांच्या किमती वाढवून कार्पाेरेटला अनुदान दिल्याचा आराेप

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मे ला सहा महिने पूर्ण झाले तसेच कामगारांच्या आंदोलनालासुद्धा सहा महिने पूर्ण होत आहेत. २६ मे २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शपथ घेतली हाेती. या घटनेलासुद्धा सात वर्षे पूर्ण झाली. या सात वर्षात सरकारने शेतकरी, शेतमजूर व कामगारांना देशोधडीला लावले. केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवून पुन्हा कार्पोरेट कंपन्यांना चौदा हजार कोटींचे अनुदान दिले आणि आता पुन्हा खेळी खेळून खताच्या किमती पूर्ववत करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे नाटकही करीत आहेत. कोराेना महामारी देशात आणण्यासाठी केंद्र सरकारचे बेजबाबदार धोरण कारणीभूत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केला.

===Photopath===

260521\26gad_4_26052021_30.jpg

===Caption===

काळे झेंडे दाखवून केंद्र शासनाचा निषेध करताना संघर्ष समितीचे कार्यकर्ते.