शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जनावरांचे तापमानापासून संरक्षण करा

By admin | Updated: May 20, 2014 23:36 IST

वैरागड : जनावरांची उत्पादकता टिकविण्यासाठी तसेच उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे.

वैरागड : जनावरांची उत्पादकता टिकविण्यासाठी तसेच उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी शिंपडणे, भरपूर पाणी पाजणे, जीवनसत्व, कॅलरीज क्षार यांचा समावेश असलेले खाद्य दिल्यानेच जनावरांचे योग्य संगोपन होऊ शकते. त्यामुळे जनावरांचे तापमानापासून योग्य संगोपन करावे असे आवाहन आरमोरी पं.स.चे पशुधन विकास पर्यवेक्षक एल. पी. लोंढे यांनी केले. उन्हाळ्यातील तापमान जनावरांना न मानवणारे असल्याने प्राथमिक स्तरावर दुधाळ जनावरांची काळजी घेताना जनावरांच्या गोठ्यात गोणपाट टाकून त्यावर पाणी शिंपडावे, दुधाळ जनावरांना दिवसातून दोन ते तीनवेळा थंड पाणी पाजावे, त्यामुळे तापमान संतुलीत राखण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या चार महिन्यात हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने अशावेळी पूर्वतयारी म्हणून हिवाळ्यातच चार्‍याचे नियोजन करावे, पशुखाद्यात साधारणपणे प्रथीनांचा समावेश करण्यासाठी हिरव्या चार्‍याचे नियोजन करावे, शरीर वाढ, नवीन पेशी व स्नायुंच्या बळकटीसाठी हिरवा मका किंवा ज्वारीचे पेंड हिवाळ्यात साठवून ठेवावे. ते उन्हाळ्यात जनावरांना चारा म्हणून उपयोगात आणता येईल. उन्हाळ्यात शेतात हिरव्या चार्‍याची लागवड करावी, त्यामुळे दुधाळ जनावरांना फायदा होऊ शकतो व पशुपालकांना दुधाचे अधिक उत्पन्न घेता येऊ शकते. उन्हाळ्यात जाणवणारी चार्‍याची टंचाई टाळण्यासाठी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात साठवणूक करून ठेवावी, असा सल्ला एल. पी. लोंढे यांनी दिला. (वार्ताहर)