शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

गाढवी नदीवर बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव धूळखातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. ...

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. देसाईगंज तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या काही भागातून गाढवी नदी वाहत असल्याने नदीचे वाहते पाणी अडवून जिरवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. विशेष बाब अशी की या नदीवर काही ठरावीक अंतरावर बारमाही रस्त्याने गावे जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या जुन्या छोट्या मोठ्या पुलांचे पिलर धूळखात पडून आहेत. त्या अनुषंगाने आमदार गजबे यांनी उपलब्ध पिलरांचा आधार घेऊन ठरावीक अंतरावर किमान तीन मीटर उंचीचे बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले जाऊन जमिनीत मुरवणे शक्य असल्याचे वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासह लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नही निकाली काढणे शक्य आहे. यास्तव आमदार गजबे यांनी विधानसभेत,राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून व नागपूरच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र लोकाभिमुख या उपक्रमाकडे शासकीय स्तरावरुन लक्षच देण्यात येत नसल्याने व अनावश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर बंधारे, शेततळी यावर अनावश्यक खर्च केला गेल्याने शासनाच्या कोट्यवधीच्या निधीचा अपव्यय हाेत आहे. बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले गेल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होण्यासोबतच आवश्यक त्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेतकरी बारमाही पीक घेऊन आर्थिक उन्नत होऊ शकतात. यास्तव देसाईगंज, आरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीसह गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांवर याच धर्तीवर कोल्हापूर बंधारे, बॅरेज बांधून भविष्यात उद्भवू पाहणाऱ्या जल संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांना उपयुक्त ठरणारा महत्वाकांक्षी उपक्रम मार्गी लावण्याची गरज असल्याचे यामुळे बोलले जाऊ लागले आहे.