शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गाढवी नदीवर बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव धूळखातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. ...

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. देसाईगंज तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या काही भागातून गाढवी नदी वाहत असल्याने नदीचे वाहते पाणी अडवून जिरवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. विशेष बाब अशी की या नदीवर काही ठरावीक अंतरावर बारमाही रस्त्याने गावे जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या जुन्या छोट्या मोठ्या पुलांचे पिलर धूळखात पडून आहेत. त्या अनुषंगाने आमदार गजबे यांनी उपलब्ध पिलरांचा आधार घेऊन ठरावीक अंतरावर किमान तीन मीटर उंचीचे बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले जाऊन जमिनीत मुरवणे शक्य असल्याचे वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासह लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नही निकाली काढणे शक्य आहे. यास्तव आमदार गजबे यांनी विधानसभेत,राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून व नागपूरच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र लोकाभिमुख या उपक्रमाकडे शासकीय स्तरावरुन लक्षच देण्यात येत नसल्याने व अनावश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर बंधारे, शेततळी यावर अनावश्यक खर्च केला गेल्याने शासनाच्या कोट्यवधीच्या निधीचा अपव्यय हाेत आहे. बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले गेल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होण्यासोबतच आवश्यक त्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेतकरी बारमाही पीक घेऊन आर्थिक उन्नत होऊ शकतात. यास्तव देसाईगंज, आरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीसह गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांवर याच धर्तीवर कोल्हापूर बंधारे, बॅरेज बांधून भविष्यात उद्भवू पाहणाऱ्या जल संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांना उपयुक्त ठरणारा महत्वाकांक्षी उपक्रम मार्गी लावण्याची गरज असल्याचे यामुळे बोलले जाऊ लागले आहे.