शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

गाढवी नदीवर बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव धूळखातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. ...

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. देसाईगंज तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या काही भागातून गाढवी नदी वाहत असल्याने नदीचे वाहते पाणी अडवून जिरवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. विशेष बाब अशी की या नदीवर काही ठरावीक अंतरावर बारमाही रस्त्याने गावे जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या जुन्या छोट्या मोठ्या पुलांचे पिलर धूळखात पडून आहेत. त्या अनुषंगाने आमदार गजबे यांनी उपलब्ध पिलरांचा आधार घेऊन ठरावीक अंतरावर किमान तीन मीटर उंचीचे बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले जाऊन जमिनीत मुरवणे शक्य असल्याचे वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासह लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नही निकाली काढणे शक्य आहे. यास्तव आमदार गजबे यांनी विधानसभेत,राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून व नागपूरच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र लोकाभिमुख या उपक्रमाकडे शासकीय स्तरावरुन लक्षच देण्यात येत नसल्याने व अनावश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर बंधारे, शेततळी यावर अनावश्यक खर्च केला गेल्याने शासनाच्या कोट्यवधीच्या निधीचा अपव्यय हाेत आहे. बॅरेज बांधण्यात आल्यास नदीचे वाहते पाणी अडविले गेल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होण्यासोबतच आवश्यक त्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेतकरी बारमाही पीक घेऊन आर्थिक उन्नत होऊ शकतात. यास्तव देसाईगंज, आरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीसह गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांवर याच धर्तीवर कोल्हापूर बंधारे, बॅरेज बांधून भविष्यात उद्भवू पाहणाऱ्या जल संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांना उपयुक्त ठरणारा महत्वाकांक्षी उपक्रम मार्गी लावण्याची गरज असल्याचे यामुळे बोलले जाऊ लागले आहे.