शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीत काँग्रेसच्या अडचणी वाढणार

By admin | Updated: May 30, 2014 00:05 IST

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला ४३ हजार मतांचा फटका बसला आहे. काँग्रेस आमदार असूनही उमेदवार माघारला. त्यामुळे आगामी विधानसभा

नाराजी वाढली : सातत्याने होत आहे मताधिक्य कमीआरमोरी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला ४३ हजार मतांचा फटका बसला आहे. काँग्रेस आमदार असूनही उमेदवार माघारला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजायला सुरूवात झाली आहे. आनंदराव गंगाराम गेडाम हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. मागील १0 वर्षांपासून ते या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आनंदराव गेडाम यांनी १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना ३६ हजार ४ मते मिळाली होती. ते ४0६ मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर २00४ ते निवडणुकीसाठी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले. त्यावेळी त्यांना ५३ हजार ५६७ मते मिळाली होती व त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर १२ हजार ७२६ मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर पुन्हा २00९ च्या निवडणुकीत आनंदराव गेडाम आरमोरी क्षेत्रातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिलेत. या निवडणुकीत आनंदराव गेडाम यांना ४१ हजार १७६ मते मिळाली. या निवडणुकी त्यांनी ५ हजार ५८३ मतांनी विजय मिळविला. हा विजय केवळ आरमोरी तालुक्यातील मतदारांच्या भरवशावर मिळालेला होता. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४८ हजार २0८ मते मिळाली आहे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य कमी-कमी होत आहे, असे दिसून येते. त्यामुळे २0१४ ची विधानसभा निवडणूक विद्यमान काँग्रेस आमदारांसाठी कसोटीची आहे.  या भागात काँग्रेसच्या राजकारणावर सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांचे वर्चस्व आहे. ते व त्यांचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत आमदार आनंदराव गेडाम यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवून अलिप्त राहिलेत. राहुल गांधी यांच्या सभेला त्यांनी हजेरी लावली व मतदारांना पक्षाला मतदान करण्याचा आवाहन केले. मात्र आमदारांविषयी असलेली मागील १0 वर्षाची नाराजी प्रचंड प्रमाणात असल्याने या मतदार संघात काँग्रेसला ४३ हजाराचा फटका बसला आहे. गेल्यावेळी २00९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केवळ १४ हजारांच्या मताधिक्याने माघारलेली होती. यंदा मात्र हे प्रमाण अडीच पटीने वाढले आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही अनेक कार्यकर्ते व नेते काँग्रेस पक्षाच्या आमदारावर नाराज आहेत. यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात आमदार १0 वर्षात अपयशी ठरले, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभा निवडणूक अडचणीची आहे.