शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

सत्ताधाऱ्यांसमोर नगर पंचायत निवडणुकीचे तगडे आव्हान

By admin | Updated: October 28, 2015 01:44 IST

पहिल्या टप्प्यात सहा नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. चार दिवसानंतर येथे मतदान होणार आहे.

गडचिरोली : पहिल्या टप्प्यात सहा नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. चार दिवसानंतर येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-शिवसेनेची कसोटी लागणार असून भाजपच्या पुलाखालून वर्षभरात किती पाणी वाहून गेले, याचाही अंदाज या निवडणूक निकालावरून येणार आहे.अहेरी उपविभागात भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा या पाच तालुक्यात तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चामोर्शी येथे पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. चामोर्शी हे जिल्ह्यातील मोठे गाव आहे. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चांगली कंबर कसली आहे.भाजपला येथे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एन्टी इन कंबन्शीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १७ जागांमध्ये भाजपच्या वाट्याला एकेरी जागाच येईल, असे मतदार राजा बोलू लागला आहे. चामोर्शीत काँग्रेससोबत अतुल गण्यारपवार व काँग्रेसमधील वायलालवार, नैताम हे गट एकत्रित आले आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी राहत होती. यावेळी सर्व गट व नेते एकसंघ होऊन निवडणुकीला समोर जात आहेत. पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेसजन सावरले असून अत्यंत आत्मविश्वासाने ही निवडणूक काँग्रेस लढत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा दौराही पक्षासाठी नवसंजीवनी देणारा ठरला. भाजपने मात्र या ठिकाणी अद्याप प्रचाराला वेग दिला नाही. नामांकनासाठी शक्ती प्रदर्शन केल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यांची येथे सभाही झाली नाही. भाजपसाठी ही निवडणूक कसोटी लावणारी आहे. त्यानंतरची मोठी नगर पंचायत म्हणजे राजनगरी अहेरी येथे आजवर नाग विदर्भ आंदोलन समितीची निर्विवाद सत्ता ग्राम पंचायतीवर राहत होती. यावेळी नाविसं भारतीय जनता पक्षासोबत मैदानात आहे. त्यामुळे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम सांभाळत आहे. काँग्रेसही मेहबूब अली यांच्या नेतृत्वात सर्व जागा लढवित आहे. याशिवाय रघुनाथ तलांडे यांनीही सर्व जागांवर उमेदवार मैदानात उतरविले आहे. अहेरीतील महाराजांचे परंपरागत वॉर्ड भाजपसाठी विजयाचा मार्ग मोकळा करू देणारे असले तरी अन्य वॉर्डांमध्ये मात्र भाजपासाठी करू वा मरूची लढाई आहे. अपक्षांचे पारडे येथे जड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही काही जागा खिशात टाकेल, असे चित्र आहे. काँग्रेसचीही परिस्थिती सुधारलेली राहील, असे राजकीय जाणकार मानतात. त्यामुळे भाजपला व पर्यायाने पालकमंत्र्यांना येथे तळ ठोकून राहावे लागत आहे. मुलचेरात काँग्रेस व माजी आ. दीपक आत्राम हे संयुक्तरित्या लढत आहे. येथे काँग्रेसला चांगले दिवस दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुलचेरा तालुका दीपक आत्राम यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहील. सिरोंचात काँग्रेस, भाजप, आविसं व राकाँ अशी चौरंगी लढत असून येथे आजवर काँग्रेसची अबाधित सत्ता होती. यावेळी या साऱ्या पक्षाचे त्यांच्यासमोर आवाहन आहे. तालुका काँग्रेस अध्यक्ष अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वात पक्ष येथे निवडणुकीला समोर जात आहे. भामरागड व एटापल्ली या दुर्गम तालुक्यातही काँग्रेस, राकाँ, भाजप व आविसं यांच्यात तुल्यबळ लढत आहे. भामरागडात काँग्रेसला बऱ्याच दिवसानंतर विजयाची मोठी आशा आहे. एटापल्लीत दीपक आत्राम यांचा आविसं चमत्कार घडविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अहेरी उपविभागात साऱ्याच नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीवर सरकारच्याही कामाचा लेखाजोखा सिद्ध करणाऱ्या ठरणार आहे. मतदार राजा कुणाच्या बाजुने कौल देतो, हे ७ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)