शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पणासाठी पोलिसांकडून दबाव

By admin | Updated: September 14, 2015 01:15 IST

वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत.

धोरणावर टीका : पत्रकातून नक्षल्यांचा आरोप गडचिरोली : वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत. वेळप्रसंगी त्यांच्यावर अत्याचारही करीत आहेत. असे भाकपा (माओवादी) सचिव भास्कर याने दुर्गम भागात टाकलेल्या पत्रकातून म्हटले आहे. पोलीस विभागाने आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नक्षल चळवळ सोडून गेलेल्या सदस्यांवर दबाव टाकला जात आहे. आत्मसमर्पितांना त्यांच्या गावाकडे जाऊ दिले जात नाही. त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. गुलामाप्रमाणे गडचिरोली किंवा अहेरी शहरात ठेवले जाते. यामुळे आत्मसमर्पितांच्या जीवन जगण्याच्या अधिकारावरच गदा आली आहे. यालाच नवजीवन म्हणायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. हे नवजीवन नसून नवदमन असल्याचेही नक्षलपत्रकात म्हटले आहे. हिंसा व अत्याचाराच्या विरोधात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी आत्मसमर्पितांनी मुक्तीची लढाई लढली पाहिजे. परिवार व जनता यांच्या खांद्याला खांदा मिळवून अस्तित्वाची लढाई लढली पाहिजे. पोलिसांकडून विविध प्रकारचे खोटी आश्वासने दिली जातात. त्यांना बळी पडू नये, असे सुध्दा नक्षल्यांनी म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)हिडामीवरील गोळीबाराचा निषेध२५ आॅगस्ट रोजी सायंकाळी मुरकुटी जंगलात सी- ६० पथकाने बोंडे गावातील आदिवासी शेतकरी कमलसिंग हिडामी याच्यावर गोळीबार करून त्याला जखमी केले. त्यानंतर हिडामीला अटक करून नक्षलवादी घोषित केले. या घटनेचा भाकपा (माओवादी) संघटना निषेध करीत आहे, असे कोरची उपकमांडर जगदीश यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे. नैनवाडी येथील उमेश मट्टामी हा पोलिसांना मदत करीत होता. पैशाच्या लालसेने तो नक्षल्यांची माहिती पोलिसांना देत असल्याचेही म्हटले आहे.