शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

आत्मसमर्पणासाठी पोलिसांकडून दबाव

By admin | Updated: September 14, 2015 01:15 IST

वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत.

धोरणावर टीका : पत्रकातून नक्षल्यांचा आरोप गडचिरोली : वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत. वेळप्रसंगी त्यांच्यावर अत्याचारही करीत आहेत. असे भाकपा (माओवादी) सचिव भास्कर याने दुर्गम भागात टाकलेल्या पत्रकातून म्हटले आहे. पोलीस विभागाने आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नक्षल चळवळ सोडून गेलेल्या सदस्यांवर दबाव टाकला जात आहे. आत्मसमर्पितांना त्यांच्या गावाकडे जाऊ दिले जात नाही. त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. गुलामाप्रमाणे गडचिरोली किंवा अहेरी शहरात ठेवले जाते. यामुळे आत्मसमर्पितांच्या जीवन जगण्याच्या अधिकारावरच गदा आली आहे. यालाच नवजीवन म्हणायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. हे नवजीवन नसून नवदमन असल्याचेही नक्षलपत्रकात म्हटले आहे. हिंसा व अत्याचाराच्या विरोधात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी आत्मसमर्पितांनी मुक्तीची लढाई लढली पाहिजे. परिवार व जनता यांच्या खांद्याला खांदा मिळवून अस्तित्वाची लढाई लढली पाहिजे. पोलिसांकडून विविध प्रकारचे खोटी आश्वासने दिली जातात. त्यांना बळी पडू नये, असे सुध्दा नक्षल्यांनी म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)हिडामीवरील गोळीबाराचा निषेध२५ आॅगस्ट रोजी सायंकाळी मुरकुटी जंगलात सी- ६० पथकाने बोंडे गावातील आदिवासी शेतकरी कमलसिंग हिडामी याच्यावर गोळीबार करून त्याला जखमी केले. त्यानंतर हिडामीला अटक करून नक्षलवादी घोषित केले. या घटनेचा भाकपा (माओवादी) संघटना निषेध करीत आहे, असे कोरची उपकमांडर जगदीश यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे. नैनवाडी येथील उमेश मट्टामी हा पोलिसांना मदत करीत होता. पैशाच्या लालसेने तो नक्षल्यांची माहिती पोलिसांना देत असल्याचेही म्हटले आहे.