शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

भविष्यात पाण्याच्या अभावानेही मनुष्याच्या मृत्युची शक्यता नाकारता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

कुरखेडा : पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. ज्याप्रमाणे जिवंत राहण्याकरिता हवेची गरज आहे, त्याचप्रमाणे पाण्याशिवायसुद्धा मनुष्य तसेच प्राणी, जीवजंतू, झाडे ...

कुरखेडा : पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. ज्याप्रमाणे जिवंत राहण्याकरिता हवेची गरज आहे, त्याचप्रमाणे पाण्याशिवायसुद्धा मनुष्य तसेच प्राणी, जीवजंतू, झाडे यांची कल्पना करता येत नाही. कोरोना या महामारीत प्राणवायू (ऑक्सिजन) अभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. भविष्यात पाण्याच्या अभावानेसुद्धा मनुष्याचा तडफडून मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्याची गरज ओळखत जलसंवर्धन व जलव्यवस्थापन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरचे विभागीय संचालक डॉ.पी.के. जैन यांनी केले.

श्री गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्यावतीने महाविद्यालयात केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या सहकार्याने एक दिवसीय आभासी (ऑनलाईन) कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होत अध्यक्षस्थानावरून डॉ.जैन यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत उपस्थित गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, शहरी भागात रेनवाॅटर हार्वेस्टिंग ही समस्या सिमेंटच्या जंगलामुळे निर्माण होत आहे. भविष्याचा वेध घेत वाहत्या पाण्याला अटकाव करून जमिनीत त्याचा अधिकाधिक निचरा होण्याकरीता उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी उपलब्ध भूजल साठ्याचे संवर्धन व संरक्षण गरजेचे असल्याचे सांगत ग्रामीण नागरिकांना शास्त्रीय प्रशिक्षण देण्यात आले तर भविष्याकरिता नवीन भूजल साठ्याचा शोध लागू शकतो, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी नागपूर येथील ज्येष्ठ वैद्यानिक निलोफर व चंद्रपूर येथील भूवैद्यानिक डॉ.विजेता सोलंकी यांनीसुद्धा सहभागी होत या विषयावर आपली मते मांडली.

प्रास्ताविक कार्तिक डोंगरे यांनी तर संचालन पौर्णिमा बाराहाते यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गुणवंत वडपल्लीवार व त्यांच्या चमूने सहकार्य केले. कार्यशाळेचा थेट लाभ परिसरातील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, अभ्यासक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

===Photopath===

290521\img-20210529-wa0067.jpg

===Caption===

फोटो आभासी कार्यशाळेत सहभागी डाॅ जैन, डॉ राजाभाऊ मूनघाटे,प्र कूलगूरू डॉ श्रीराम कावळे