शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

फळांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात जात आहे विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:38 IST

देसाईगंज : देसाईगंज शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून, विक्रेत्यांकडून ‘कार्बाईड’ या रासायनिक पदार्थाचा वापर सर्रास केला जात ...

देसाईगंज : देसाईगंज शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून, विक्रेत्यांकडून ‘कार्बाईड’ या रासायनिक पदार्थाचा वापर सर्रास केला जात आहे. अशा पद्धतीने कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक आहेत. त्यामुळे अशी फळे विकणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र, त्यासाठी या विभागाकडे मनुष्यबळच नसल्यामुळे सर्रास विषयुक्त फळांचे सेवन सर्वजण करताना दिसून येत आहेत.

सरकारने सन १९७९ मध्ये 'प्रिव्हेंशन ऑफ फूड ॲडल्ट रेशन ॲक्ट’ तयार करून त्यात कलम ४४ (अ, आ)चा अंतर्भाव केला. त्यानुसार कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यावर बंदी घालून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, कुठेच कारवाई होत नाही. नागरिक दररोज आरोग्यवर्धक म्हणून फळे सेवन करतात. तसेच आजारी व्यक्तींना, लहान मुलांना सकस व पौष्टिक आहार म्हणून खायला देतात. ती फळे नैसर्गिकरीत्या पिकू न देता कार्बाईडने पिकविलेली असतात. ती दिसायला अत्यंत आकर्षक असली तरी शरीराला अपायकारक असतात.

फळे पौष्टिक आहार म्हणून लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना दिली जातात. अनेक फळे, फळांचे ज्युस रोजच्या वापरात असतात. बहुतेक फळे नैसर्गिकरीत्या पिकविण्यासाठी अवधी जास्त लागत असल्याने ती सरळसरळ कार्बाईडने पिकविण्याची पद्धती अवलंबिली जाते. त्यामुळे हे मानवी शरीरावर परिणाम करणारे स्लो पॉयझन आपण शरीरात घेतो. अशा कृत्रिमरीत्या फळे पिकविणाऱ्या व्यापारी, विक्रेत्यांविरुद्ध संबंधित विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.

(बॉक्स)

अशी होते रासायनिक प्रक्रिया

- फळांना पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा पाण्याशी संबंध येऊन रासायनिक क्रिया घडते व त्यातून ॲसिटीलीन व ईथिलीन हा वायू तयार होतो. ईथिलीनमुळे फळे पिकतात. ॲसिटिलीनचा काहीही उपयोग होत नाही; पण हा वायू मानवी शरीराला हानिकारक ठरतो.

- या वायूमुळे भोवळ येणे, मळमळ, डोकेदुखी असे परिणाम दिसून येतात. ही फळे खाणाऱ्यांमध्ये या दुष्परिणामांची व्याप्ती किती असते हे स्पष्ट नसले तरी फळे पिकविण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या हायड्रोकार्बन्सचा (जे फळात विरघळतात) वाईट परिणाम खाणाऱ्यांच्या पचनसंस्थेवर होतो.

010921\5352img_20210901_181129.jpg

शहरात असे पिकविलेले हे कार्बाईडयुक्त फळांची विक्री.