शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

फळांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात जात आहे विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:38 IST

देसाईगंज : देसाईगंज शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून, विक्रेत्यांकडून ‘कार्बाईड’ या रासायनिक पदार्थाचा वापर सर्रास केला जात ...

देसाईगंज : देसाईगंज शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून, विक्रेत्यांकडून ‘कार्बाईड’ या रासायनिक पदार्थाचा वापर सर्रास केला जात आहे. अशा पद्धतीने कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक आहेत. त्यामुळे अशी फळे विकणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र, त्यासाठी या विभागाकडे मनुष्यबळच नसल्यामुळे सर्रास विषयुक्त फळांचे सेवन सर्वजण करताना दिसून येत आहेत.

सरकारने सन १९७९ मध्ये 'प्रिव्हेंशन ऑफ फूड ॲडल्ट रेशन ॲक्ट’ तयार करून त्यात कलम ४४ (अ, आ)चा अंतर्भाव केला. त्यानुसार कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यावर बंदी घालून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, कुठेच कारवाई होत नाही. नागरिक दररोज आरोग्यवर्धक म्हणून फळे सेवन करतात. तसेच आजारी व्यक्तींना, लहान मुलांना सकस व पौष्टिक आहार म्हणून खायला देतात. ती फळे नैसर्गिकरीत्या पिकू न देता कार्बाईडने पिकविलेली असतात. ती दिसायला अत्यंत आकर्षक असली तरी शरीराला अपायकारक असतात.

फळे पौष्टिक आहार म्हणून लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांना दिली जातात. अनेक फळे, फळांचे ज्युस रोजच्या वापरात असतात. बहुतेक फळे नैसर्गिकरीत्या पिकविण्यासाठी अवधी जास्त लागत असल्याने ती सरळसरळ कार्बाईडने पिकविण्याची पद्धती अवलंबिली जाते. त्यामुळे हे मानवी शरीरावर परिणाम करणारे स्लो पॉयझन आपण शरीरात घेतो. अशा कृत्रिमरीत्या फळे पिकविणाऱ्या व्यापारी, विक्रेत्यांविरुद्ध संबंधित विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.

(बॉक्स)

अशी होते रासायनिक प्रक्रिया

- फळांना पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा पाण्याशी संबंध येऊन रासायनिक क्रिया घडते व त्यातून ॲसिटीलीन व ईथिलीन हा वायू तयार होतो. ईथिलीनमुळे फळे पिकतात. ॲसिटिलीनचा काहीही उपयोग होत नाही; पण हा वायू मानवी शरीराला हानिकारक ठरतो.

- या वायूमुळे भोवळ येणे, मळमळ, डोकेदुखी असे परिणाम दिसून येतात. ही फळे खाणाऱ्यांमध्ये या दुष्परिणामांची व्याप्ती किती असते हे स्पष्ट नसले तरी फळे पिकविण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या हायड्रोकार्बन्सचा (जे फळात विरघळतात) वाईट परिणाम खाणाऱ्यांच्या पचनसंस्थेवर होतो.

010921\5352img_20210901_181129.jpg

शहरात असे पिकविलेले हे कार्बाईडयुक्त फळांची विक्री.