शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

एटापल्लीच्या मुख्य रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:17 IST

अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील पूलही क्षतिग्रस्त झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने एटापल्ली-जारावंडी मार्गावरील बसफेरी बंद केली आहे.

ठळक मुद्देएटापल्ली-जारावंडी मार्गही उखडला : महामंडळाने जारावंडी बससेवा केली बंद

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील पूलही क्षतिग्रस्त झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने एटापल्ली-जारावंडी मार्गावरील बसफेरी बंद केली आहे. अशीच परिस्थिती एटापल्ली तालुक्याच्या अनेक मुख्य मार्गांची आहे.एटापल्ली-गट्टा, एटापल्ली-येमली यासह अनेक मार्गांची अवस्था बकाल झाली आहे. मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिकेतून अहेरीकडे नेणाऱ्या रुग्णांचे रस्त्याच्या दुरवस्थेने हाल होत आहे. रस्त्याच्या या बकाल अवस्थेने रुग्णवाहिकेतून नेत असलेल्या गर्भवती महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली व बाळ दगावल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने या तालुक्यात प्रमुख मार्गांवर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.तालुक्यातील एटापल्ली-आलापल्ली हा मार्ग बºयापैकी आहे. या मार्गाची क्षमता १० टन माल वाहतुकीची आहे. मात्र या मार्गावरून ५० पेक्षा अधिक टन लोह दगडाची वाहतूक ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय या मार्गावर लोह दगडाचे शेकडो ट्रक धावत आहेत. त्यामुळे सदर मार्ग अधिक दिवस टिकणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच अहेरी तालुक्यातील प्रमुख मार्गांकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.