शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीसाठी वृक्षारोपण करा

By admin | Updated: July 8, 2017 01:09 IST

कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे,

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आलापल्ली येथे वृक्षारोपण लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी शुक्रवारी केले. आलापल्ली वन विभागाच्या मार्फतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आलापल्लीत करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. येटबॉन, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिन्नीसिंह, भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरण बाला, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घारूडे, वन विकास महामंडळ प्राणहिता विभागाचे विभागीय व्यवस्थापक वाघाये, अहेरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे, उपसरपंच पुष्पा अलोणे, अहेरीच्या नगरसेविका हर्षा ठाकरे, माजी जि.प. सदस्य विजया विठ्ठलानी, शिला सिध्दीकी, वंदना सवरंगपथे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्य वनसंरक्षक यांनी पालकमंत्र्यांना रोपटे देऊन स्वागत केले. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वनांचे संरक्षण संवर्धनासाठी जिल्ह्याचे राज्यात कौतुक होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपक्रमाचे देशभरात कौतुक होत आहे. येणाऱ्या पिढीला वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात वनांचे जतन पूर्वजांकडून होत आले आहे. त्यामुळे जतन केलेल्या वनांचे संरक्षण करण्याची व वनक्षेत्र वाढविण्याची जबाबदारी भावी पिढीकडे आहे, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक येटबॉन, संचालन उपवनसंरक्षक रवी अग्रवाल यांनी केले. वनकर्मचाऱ्यांचा सत्कार वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात वन विभागाचा विशेष वाटा आहे. नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यापासून तर वृक्ष उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाने पेलली आहे. त्याचबरोबर मोठ्या झालेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी वन विभागाला पेलावी लागणार आहे. वन संवर्धन तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात विशेष कार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.