शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

दुष्काळमुक्तीसाठी वृक्षारोपण करा

By admin | Updated: July 8, 2017 01:09 IST

कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे,

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आलापल्ली येथे वृक्षारोपण लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी शुक्रवारी केले. आलापल्ली वन विभागाच्या मार्फतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आलापल्लीत करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. येटबॉन, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिन्नीसिंह, भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरण बाला, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घारूडे, वन विकास महामंडळ प्राणहिता विभागाचे विभागीय व्यवस्थापक वाघाये, अहेरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे, उपसरपंच पुष्पा अलोणे, अहेरीच्या नगरसेविका हर्षा ठाकरे, माजी जि.प. सदस्य विजया विठ्ठलानी, शिला सिध्दीकी, वंदना सवरंगपथे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्य वनसंरक्षक यांनी पालकमंत्र्यांना रोपटे देऊन स्वागत केले. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वनांचे संरक्षण संवर्धनासाठी जिल्ह्याचे राज्यात कौतुक होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपक्रमाचे देशभरात कौतुक होत आहे. येणाऱ्या पिढीला वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात वनांचे जतन पूर्वजांकडून होत आले आहे. त्यामुळे जतन केलेल्या वनांचे संरक्षण करण्याची व वनक्षेत्र वाढविण्याची जबाबदारी भावी पिढीकडे आहे, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक येटबॉन, संचालन उपवनसंरक्षक रवी अग्रवाल यांनी केले. वनकर्मचाऱ्यांचा सत्कार वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात वन विभागाचा विशेष वाटा आहे. नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यापासून तर वृक्ष उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाने पेलली आहे. त्याचबरोबर मोठ्या झालेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी वन विभागाला पेलावी लागणार आहे. वन संवर्धन तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात विशेष कार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.