शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

दुष्काळमुक्तीसाठी वृक्षारोपण करा

By admin | Updated: July 8, 2017 01:09 IST

कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे,

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : आलापल्ली येथे वृक्षारोपण लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : कोरड्या दुष्काळाप्रसंगी मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी शुक्रवारी केले. आलापल्ली वन विभागाच्या मार्फतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आलापल्लीत करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. येटबॉन, आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिन्नीसिंह, भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरण बाला, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घारूडे, वन विकास महामंडळ प्राणहिता विभागाचे विभागीय व्यवस्थापक वाघाये, अहेरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे, उपसरपंच पुष्पा अलोणे, अहेरीच्या नगरसेविका हर्षा ठाकरे, माजी जि.प. सदस्य विजया विठ्ठलानी, शिला सिध्दीकी, वंदना सवरंगपथे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्य वनसंरक्षक यांनी पालकमंत्र्यांना रोपटे देऊन स्वागत केले. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वनांचे संरक्षण संवर्धनासाठी जिल्ह्याचे राज्यात कौतुक होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपक्रमाचे देशभरात कौतुक होत आहे. येणाऱ्या पिढीला वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात वनांचे जतन पूर्वजांकडून होत आले आहे. त्यामुळे जतन केलेल्या वनांचे संरक्षण करण्याची व वनक्षेत्र वाढविण्याची जबाबदारी भावी पिढीकडे आहे, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक येटबॉन, संचालन उपवनसंरक्षक रवी अग्रवाल यांनी केले. वनकर्मचाऱ्यांचा सत्कार वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात वन विभागाचा विशेष वाटा आहे. नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यापासून तर वृक्ष उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाने पेलली आहे. त्याचबरोबर मोठ्या झालेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी वन विभागाला पेलावी लागणार आहे. वन संवर्धन तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात विशेष कार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.