शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची योग्य विल्हेवाट लावा, नाहीतर मार्गक्रमणासाठी डोंगा द्या

By admin | Updated: July 1, 2016 01:25 IST

पावसाळ्यात आठवडी बाजार परिसरातील पूर्ण पाणी गायत्रीनगरात वाहत येते. या पाण्याची दिशा थेट गायत्रीनगराच्या

चप्पल-बुटांसह घाणपाणी शिरते घरात : गायत्रीनगरवासीयांचा सवालपावसाळ्यात आठवडी बाजार परिसरातील पूर्ण पाणी गायत्रीनगरात वाहत येते. या पाण्याची दिशा थेट गायत्रीनगराच्या केंद्रबिंदूत असल्याने तसेच चढत्या भागाकडे नालीचे बांधकाम केल्यामुळे पाणी थेट नालीतून वाहत न जाता नागरिकांच्या घरात शिरते. आठवडी बाजार व दुकानलाईन परिसरातील चप्पल-बुट व प्लास्टिक घनकचरा वाहून आणलेले पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. हा कचरा काढतानाच नागरिकांच्या नाकीनऊ येत असते. हा त्रास नागरिकांना केवळ पावसाळ्यातच सहन करावा लागत नाही तर ऐरवी दिवसातही आठवडी बाजार तसेच दुकानलाईन परिसरातील घनकचरा सांडपाण्यासह वाहत येत असते. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नालीची दिशा बदलावी पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अथवा पावसाळ्यात आवागमनासाठी नागरिकांना नगर परिषदेने डोंगा द्यावा, असा उद्विग्न सवाल गायत्रीनगरातील नागरिकांनी गुरूवारी नगर परिषद प्रशासनाला केला. अधिकारी म्हणतात, तुमचा ले-आऊट चुकीचा!१६ ते १७ वर्षांपासून गायत्रीनगर वसलेले आहे. सध्या येथे ३० घरांची वस्ती आहे. परंतु जेव्हा येथील समस्या मांडण्याकरिता प्रशासनदरबारी नागरिक जातात व त्यानंतर स्थानिक प्रशासनातील अधिकारी चौकशीकरिता येतात, तेव्हा अधिकारी नागरिकांना तुमचा ले-आऊटच चुकीचा आहे, असे सांगून समस्या सोडविण्याची मागणी झिडकारून लावतात. अकृषक केलेले प्लॉटचे ले-आऊट कसे चुकीचे राहणार, अशी भावना येथील नागरिकांनी लोकमत चमूजवळ व्यक्त केली. गायत्रीनगरातील नाल्यांचे बांधकाम करताना उतार दिशेने जाणाऱ्या नाल्या बांधणे गरजेचे होते. परंतु दक्षिणेकडे उतार न देता उत्तरेकडे उतार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी उतार भागाने वाहत न जाता थेट नागरिकांच्या अंगणात शिरते. त्यामुळे नागरिकांना आपल्या गाड्या बाहेरच ठेवाव्या लागतात. ऐरवी सुख-दु:ख वाटणारे गायत्रीनगर या समस्यांमुळे दु:खी आहे. हरबाजी मोरे यांच्या घरापासून डॉ. बिडकर - किशोर सोनटक्के - लाकडे यांच्या घरापर्यंत चौकूट रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण १७ वर्षांचा कालावधी उलटूनही झालेले नाही. शिवाय विसापूर मार्गाला जोडणारा ९ मीटर रूंदीचा रस्ता तसेच चंद्रपूर मार्गाला जोडणारा १२ मीटर रूंदीचा रस्ता मंजूर असताना सुद्धा याचे बांधकाम झाले नाही. पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे बांधकाम होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु पावसाळा सुरू होऊन सुद्धा अद्यापही काम सुरू करण्यात आले नाही. नगर परिषदेचे पदाधिकारी नागरिकांची केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप गायत्रीनगरवासीयांनी केला आहे.रस्त्याचे काम मंजूर, मात्र डांबरीकरणाची प्रतीक्षाच!नगर परिषदेचे संकुल - डॉ. बिडकर - दिलीप सोनटक्के ते विजय लाकडे यांच्या घरापर्यंत डांबरी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे, असे या प्रभागाचे नगरसेवक विजय गोरडवार यांनी नागरिकांना सांगितले. याशिवाय या कामाची निविदाही काढण्यात आली आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र पावसाळा सुरू होऊनही नगर पालिका प्रशासनाच्या वतीने या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे या भागातील पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत. या ठिकाणी रस्ता न झाल्यामुळे पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागतो, इतकी दयनीय अवस्था गायत्रीनगरात आहे, असे येथील नागरिक हरबाजी मोरे यांनी सांगितले. जिन्यापर्यंत पोहोचते घाणपाणी; आटतपर्यंत करावी लागते प्रतीक्षापावसाळ्यात आठवडी बाजार परिसरातील पाणी काडीकचऱ्यासह गायत्रीनगरात पोहोचत असते. परंतु चुकीच्या पद्धतीने नाली बांधकाम केल्यामुळे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नाही. नगरातील किशोर सोनटक्के यांच्या घराच्या जिन्यापर्यंत पाणी पोहोचत असल्याने कुटुंबीय पाणी निघण्याची प्रतीक्षा करीत असतात. परंतु पाणी आटतपर्यंत जिन्यापर्यंत चढलेले पाणी उतरत नाही. सोनटक्के यांच्या घराजवळ लहान सिमेंट पाईप टाकण्यात आले आहे, परंतु या पाईपात पाणी अडकून असते. कुटुंबीय पाईपमध्ये बांबू टाकून पाणी वाहते करण्याचा प्रयत्न करतात. पाण्याचा उतार उंच जागेकडे असल्याने उतारावरील असलेल्या घराकडे पाण्याचा प्रवाह असतो. परिणामी अंगणात पाणी शिरत असते.