शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

पेसा कायद्याने ग्रामसभांचे बळकटीकरण शक्य

By admin | Updated: June 29, 2016 01:28 IST

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे बळकटीकरण शक्य आहे,

जिल्हा न्यायाधीशांचे प्रतिपादन : आदिवासी हक्क व संरक्षणावर मार्गदर्शन शिबिरगडचिरोली : पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे बळकटीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एन. पदवाड यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आदिवासी हक्क संरक्षण व कार्यवाही योजना २०१५’ च्या अंमलबजावणीबाबत शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून जि. प. चे वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, सह दिवाणी न्यायाधीश सु. म. बोमिडवार, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रास्ताविकेतून मुख्य न्याय दंडाधिकारी रेहपाडे यांनी पेसा कायद्यावर मार्गदर्शन केले. वाघमारे यांनी पेसा कायद्याची व्याप्ती व स्वरूप आणि तरतूदी याबाबत माहिती दिली. देवाजी तोफा यांनी पेसा कायदा व त्याची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावयास पाहिजे, यावर मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन न्यायालयाचे कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके यांनी केले तर आभार सह दिवाणी न्यायाधीश बोमिडवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)