शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

कायम शब्द काढला मात्र अनुदानाचा पत्ता नाही

By admin | Updated: December 7, 2014 22:51 IST

राज्य शासनाने २००१ पासून सुरू केलेल्या कायम विनाअनुदानित शाळांचा २००९ साली कायम हा शब्द हटवून २०१२ पासून अनुदान देण्यासाठी शाळा मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली.

गडचिरोली : राज्य शासनाने २००१ पासून सुरू केलेल्या कायम विनाअनुदानित शाळांचा २००९ साली कायम हा शब्द हटवून २०१२ पासून अनुदान देण्यासाठी शाळा मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली. मात्र मूल्यांकनाच्या अटी व शर्ती अत्यंत जाचक असल्याने एकही शाळा अनुदानास पात्र ठरू शकली नाही. मागील १३ वर्षांपासून विना वेतनावर नोकरी करणाऱ्या शिक्षकांचे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करून राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने कायम विना अनुदानित तत्वावर २००१ पासून खासगी शिक्षण संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. आज ना उद्या अनुदान देईल. या आशेवर अनेक शिक्षण संस्था चालकांनी खेडोपाडी शाळा सुरू केल्या. संस्था चालकांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून गलेगठ्ठ डोनेशन घेऊन नियुक्ती केली. त्यामुळे संस्था प्रमुखही लखोपती झाले. चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अनुदान देण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अनुदानासाठी शासनाकडे मागणी सुरू केली. मात्र दरवर्षी वेगवेगळी कारणे देत शासनाने कर्मचाऱ्यांना झुलविण्याचे धोरण सुरू केले. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सततच्या रेट्यानंतर शासनाने २००९ साली शाळांचा कायम शब्द काढून केवळ विनाअनुदानित हा शब्द ठेवला. कायम शब्द काढल्यानंतर शिक्षकांच्या थोड्या आशा पल्लवित झाल्या. मात्र अनुदानासाठी शाळांना पात्र ठरविण्यासाठी मूल्यांकनाची प्रक्रिया तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजेच २०१२ रोजी सुरू केली. मूल्यांकनाच्या अटी व शर्ती अत्यंत जाचक ठेवल्या. त्यामुळे त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो विनाअनुदानित शाळांपैकी केवळ १३ ते १४ शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या. सदर शाळांनासुध्दा अजूनपर्यंत अनुदान देण्यात आले नाही. मागील १३ वर्षांपासून राज्यात हजारो शिक्षक विनावेतनावर काम करीत आहेत. शिक्षण संस्थेकडून या शिक्षकांना पाचही पैशाचे मानधन दिले जात नाही. काही शिक्षकांनी तर चाळीशी पारसुध्दा केली आहे. मात्र अनुदानाचा पत्ता नसल्याने त्रस्त झाले आहेत. १३ वर्ष सेवा देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या गुरूजींचे कुटुंब मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. सततच्या निराशेपोटी अनेक शिक्षक व कर्मचारी वेसनाधिन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुष्याचा उमेदीचा काळ अद्यापन करण्यात गेला. आता नेमके काय करावे, असा प्रश्न अनेक शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील काही शिक्षक शनिवारी व रविवारी तसेच सुटीच्या दिवसामध्ये मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. शासनाने यापुढेही कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता, अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा या शिक्षकांवर आत्महत्या करण्याची पाळी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)