शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

कायम शब्द काढला मात्र अनुदानाचा पत्ता नाही

By admin | Updated: December 7, 2014 22:51 IST

राज्य शासनाने २००१ पासून सुरू केलेल्या कायम विनाअनुदानित शाळांचा २००९ साली कायम हा शब्द हटवून २०१२ पासून अनुदान देण्यासाठी शाळा मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली.

गडचिरोली : राज्य शासनाने २००१ पासून सुरू केलेल्या कायम विनाअनुदानित शाळांचा २००९ साली कायम हा शब्द हटवून २०१२ पासून अनुदान देण्यासाठी शाळा मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली. मात्र मूल्यांकनाच्या अटी व शर्ती अत्यंत जाचक असल्याने एकही शाळा अनुदानास पात्र ठरू शकली नाही. मागील १३ वर्षांपासून विना वेतनावर नोकरी करणाऱ्या शिक्षकांचे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करून राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने कायम विना अनुदानित तत्वावर २००१ पासून खासगी शिक्षण संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. आज ना उद्या अनुदान देईल. या आशेवर अनेक शिक्षण संस्था चालकांनी खेडोपाडी शाळा सुरू केल्या. संस्था चालकांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून गलेगठ्ठ डोनेशन घेऊन नियुक्ती केली. त्यामुळे संस्था प्रमुखही लखोपती झाले. चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अनुदान देण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अनुदानासाठी शासनाकडे मागणी सुरू केली. मात्र दरवर्षी वेगवेगळी कारणे देत शासनाने कर्मचाऱ्यांना झुलविण्याचे धोरण सुरू केले. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सततच्या रेट्यानंतर शासनाने २००९ साली शाळांचा कायम शब्द काढून केवळ विनाअनुदानित हा शब्द ठेवला. कायम शब्द काढल्यानंतर शिक्षकांच्या थोड्या आशा पल्लवित झाल्या. मात्र अनुदानासाठी शाळांना पात्र ठरविण्यासाठी मूल्यांकनाची प्रक्रिया तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजेच २०१२ रोजी सुरू केली. मूल्यांकनाच्या अटी व शर्ती अत्यंत जाचक ठेवल्या. त्यामुळे त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो विनाअनुदानित शाळांपैकी केवळ १३ ते १४ शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या. सदर शाळांनासुध्दा अजूनपर्यंत अनुदान देण्यात आले नाही. मागील १३ वर्षांपासून राज्यात हजारो शिक्षक विनावेतनावर काम करीत आहेत. शिक्षण संस्थेकडून या शिक्षकांना पाचही पैशाचे मानधन दिले जात नाही. काही शिक्षकांनी तर चाळीशी पारसुध्दा केली आहे. मात्र अनुदानाचा पत्ता नसल्याने त्रस्त झाले आहेत. १३ वर्ष सेवा देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या गुरूजींचे कुटुंब मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. सततच्या निराशेपोटी अनेक शिक्षक व कर्मचारी वेसनाधिन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुष्याचा उमेदीचा काळ अद्यापन करण्यात गेला. आता नेमके काय करावे, असा प्रश्न अनेक शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील काही शिक्षक शनिवारी व रविवारी तसेच सुटीच्या दिवसामध्ये मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. शासनाने यापुढेही कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता, अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा या शिक्षकांवर आत्महत्या करण्याची पाळी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)