शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

शीतपेय विक्रीत परराज्याचा टक्का वाढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST

आरमोरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेशातील कानपूर, राजस्थान व इतर प्रदेशातील लोक दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येऊन शहरातील जुना ...

आरमोरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेशातील कानपूर, राजस्थान व इतर प्रदेशातील लोक दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येऊन शहरातील जुना बसस्थानक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी लस्सी व थंड पेयाचा व्यवसाय टाकून लस्सी, कुल्फी आईस्क्रीम व इतर थंड पेय व खाण्याचे पदार्थ विकत असतात. मोक्याच्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन ते चार महिने धंदा करतात. त्यांच्या दुकानात काम करणारी माणसेसुद्धा स्थानिकच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धंदा करीत असल्याने त्यांच्या शहरात ओळखी पण वाढल्या आहेत. त्यांच्या लस्सीला मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे. शिवाय दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसोबत ते प्रेमाने बोलतात व आदराने वागतात. या स्वभावामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित हाेतात. त्यांच्याकडून मिळणारी सेवाही चांगली असते. त्यामुळेच स्थानिकांना त्यांच्या चवदार लस्सीची भुरळ पडते. दुसऱ्यांदा ग्राहकांची पावले आपसूकच त्यांच्या दुकानात वळत असतात. मार्च, एप्रिल, मे व जून, या चार महिन्यात त्यांचा व्यवसाय जाेमात चालताे. वर्षभराची कमाई ते चार महिन्यात करतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा आपल्या राज्यात परत जातात. मात्र ही किमया स्थानिकांना करता आली नाही. त्यांच्यात हा व्यवसाय करण्याची आवड नाही. त्यामुळे लस्सीच्या व्यवसायात स्थानिक माणूस मागे पडला आहे.

उत्तरप्रदेश व राजस्थानमधील लोक हे आपल्या शहरात येऊन लस्सी व थंड पेयाचा धंदा करून जातात मात्र स्थानिक माणूस उत्तरप्रदेश व राजस्थानमध्ये जाऊन व्यवसाय करणे तर सोडाच तो आपल्या गावातसुद्धा व्यवसाय करू शकत नाही. ही वास्तविकता आहे. हंगामी व्यवसाय करण्यासाठी हजारो किमीचे अंतर कापून आपल्या कुटुंबापासून कोसो दूर राहून व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रदेशात जाऊन धंदा करणे हे सोपे काम नाही. त्याच्या हिमतीला व कर्तबगारीला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. चिकाटी व व्यावसायिक दृष्टिकोनामुळे ते व्यवसायात पुढे गेले आहेत. चार महिन्याच्या या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचे वर्षभराचे बजेट अवलंबून असताे.

उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्पर्धा आहे. परंतु गडचिराेली जिल्ह्यात व्यावसायिक स्पर्धा नाही.

बाॅक्स

माेक्याच्या जागेवर व्यवसाय

परराज्यातील अनेक व्यावसायिकांनी व्यवसाच्या दृष्टीने माेक्याच्या ठिकाणी जागा घेऊन घरेही बांधली आहेत. याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. दरवर्षी उन्हाळ्यात चार महिने व्यवसाय करायचा असतो. त्यासाठी पुढच्या वर्षातील जागेचे भाडे आदल्याच वर्षी देऊन दरवर्षीची मोक्याची जागा ते बुक करतात. परंतु दिवसेंदिवस परिस्थिती बदलत असते. भविष्यात कदाचित मोक्याची जागा मिळाली नाही तर व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी जागा खरेदी करून घरेही बांधली आहेत. एवढ्या व्यावसायिक दूरदृष्टीने ते काम करतात. सकाळपासून रात्री अकरा वाजतापर्यंत सतत दुकाने सुरू ठेवतात. दरवर्षी तेजीत चालणारा हा व्यवसाय मागील वर्षी मात्र, कोरोना लााॅकडाऊनमुळे ताेट्यात गेला.