शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पालक झटकताहेत जबाबदारी

By admin | Updated: June 28, 2014 00:47 IST

शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे.

गडचिरोली : शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक आपल्या मुलांप्रती असलेली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते. केवळ गुणवत्ता वाढावी, या हेतूने शिकवण्या लावल्या जातात. मात्र, त्यात सुधारणा होतेच असे नाही. उलट त्याचा मुलांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा पालकांशी संवाद कमी होत चालला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी शहरातील वाढत्या ‘शिकवणी कल्चर’वर प्रतिक्रिया व्यक्त केली.मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वेळ नसल्याने, तसेच गुणवत्तावाढीसाठी पालकांचा कल खासगी शिकवण्यांकडे जास्त असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. पूर्वी ज्या मुलाला शिकवणी आहे, तो मुलगा अभ्यासात मागे असणार, असे समजले जायचे. आता मात्र ज्या मुलांना शिकवणी नाही, त्यांची गुणवत्ता कमी असते, असा समज निर्माण होत चालला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलांच्या गुणवत्तेसाठी शाळा आणि पालकांनीच प्रयत्न करायला हवेत. शिकवणी लावून पालक विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र,त्याचा उलट परिणाम होताना दिसतो. पालकही आपली जबाबदारी झटकत असल्याचे हे लक्षण आहे. पालकांनी मुलांना घरीच जास्त वेळ दिल्यास त्यांच्यातील संवाद वाढण्यासही मदत होईल. मुलांमध्ये आत्मविश्वासही वाढीस लागेल. गंमत-जंमत करतांनाच पाल्याचाही गृहपाठ पूर्ण होईल. त्यामुळे त्याला गृहपाठाचे ओझे वाटणार नाही. पालक व पाल्यामध्ये स्रेहाचे संबंध निर्माण होण्यास मदत होईल, असे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)