शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

नक्षल्यांच्या हिंसक घटनांनी दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मागील एक महिन्यापासून नक्षलवाद्यांनी विविध हिंसक घटना घडविल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण ...

ठळक मुद्देठिकठिकाणी टाकली पत्रके : २० दिवसांपासून कारवाया वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील एक महिन्यापासून नक्षलवाद्यांनी विविध हिंसक घटना घडविल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेंदूपत्त्याच्या हंगामावरही नक्षल्यांच्या दहशतीचा परिणाम झाला आहे.महाराष्ट्र दिनाच्या रात्री नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील डांबर प्लान्टवरील २७ वाहनांना आग लावली. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या १५ पोलीस व एक वाहन चालकालाही लक्ष्य करण्यात नक्षलवादी यशस्वी झाले. या घटनानंतर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. एटापल्ली, भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर बांधून तसेच नक्षलपत्रके टाकून सरकार व पोलिसांवर टिका केली आहे. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचा अंदाज यायला लागला असतानाच नक्षलवादी पुन्हा आक्रमक झाले आहेत.१९ मे रोजी नक्षलवाद्यांनी बदंचे आवाहन केले होते. सदर बंद यशस्वीकरण्यासाठी नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील कुरंडी रिठ व चिपरी तसेच एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली येथील लाकूड बिटांना आग लावली. या दोन्ही ठिकाणी नक्षल बॅनर बांधले. बंदच्या दिवशी तेंदूपत्ता संकलन न करण्याचे आवाहन केले होते. नक्षल्यांच्या दहशतीने घाबरलेल्या ग्रामस्थांनी १९ मे रोजी तेंदूपत्त्याचे संकलन सुध्दा बंद ठेवले.तेंदूपत्ता संकलनासाठी ग्रामीण भागातील नागरिक दुर्गम भागात जातात. मात्र नक्षल्यांच्या या दहशतीमुळे काही मजूर तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम अर्धवट सोडून घराकडे परत येत आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन कमी होण्याची शक्यता आहे.नक्षल बंदचा गावकऱ्यांकडून तीव्र विरोधगडचिरोली : नक्षल्यांकडून १९ मे रोजी बंद पाळण्यात आला होता. यादरम्यान नक्षलवाद्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा दुर्गम भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली परिसरातील नागरिकांनी नक्षल बॅनरची होळी सुध्दा केली. यावरून नागरिकांमध्ये नक्षलवाद्यांविषयी चिड आहे. मात्र उघडपणे ते विरोध करू शकत नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी