शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बँकेने विकासाची गती वाढेल

By admin | Updated: March 7, 2016 01:02 IST

शासनाच्या विकासाच्या योजना गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या नागरिकांपर्यंत बँक पोहोचली असणे अत्यंत गरजेचे आहे.

अम्ब्रीशराव आत्राम : रेगुंठा शाखा व सिरोंचा बँक इमारतीचे उद्घाटनसिरोंचा : शासनाच्या विकासाच्या योजना गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या नागरिकांपर्यंत बँक पोहोचली असणे अत्यंत गरजेचे आहे. बँकेमुळे आर्थिक व्यवहार गतिमान होण्यास मदत होऊन विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तालुक्यातील रेगुंठा येथे शाखा सुरू करण्यात आली. त्याचबरोबर सिरोंचा येथील बँक इमारतीचे उद्घाटन असा दुहेरी कार्यक्रम स्थानिक क्रीडा संकुलाच्या सभागृहात रविवारी पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, सिरोंचाचे नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरगेलवार, तालुकाध्यक्ष कलाम हुसेन, नाविस नेते बापू रंगूवार, रामभाऊ कोमेरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा सादर केला. पुढे मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आर्थिक उलाढाल कमी असल्याने राष्ट्रीयकृत बँका आपल्या शाखा उघडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सिरोंचा येथे स्वत:ची इमारत बांधली. त्याचबरोबर रेगुंठासारख्या दुर्गम गावात स्वत:ची शाखा स्थापन केली आहे. ही बाब जिल्हावासीय व बँक प्रशासनासाठी अतिशय लौकिकाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापक अरूण निंबेकर तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)