शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

१ मार्चपासून शाळाबाह्य मुलांचा घेतला जाणार शाेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:12 IST

गडचिराेली : ६ ते १४ या वयाेगटातील बालक सतत एक महिन्यापासून अनुपस्थित राहिल्यास त्याला शाळाबाह्य बालक असे म्हटले ...

गडचिराेली : ६ ते १४ या वयाेगटातील बालक सतत एक महिन्यापासून अनुपस्थित राहिल्यास त्याला शाळाबाह्य बालक असे म्हटले जाते. या बालकांचा शाेध घेण्यासाठी दिनांक १ ते १० मार्च या कालावधीत शिक्षण विभागामार्फत जिल्हाभरात विशेष माेहीम राबवली जाणार आहे.

बालकांच्या माेफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क, अधिकारी अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयाेगटातील प्रत्येक बालकाला शिक्षण देणे आवश्यक आहे. बहुतांश विद्यार्थी शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, राेजगाराच्या शाेधात स्थलांतरित हाेणाऱ्या पालकांचे पाल्य बऱ्याचदा शाळेत जात नाहीत. या बालकांचा शाेध घेऊन त्यांचे नाव शाळेत दाखल करायचे आहे. शहरातील गजबलेल्या वस्त्या, बसस्थानक, वीटभट्ट्या, स्थलांतरित कुटुंब, झाेपड्या, फुटपाथ आदी ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थी आढळण्याची शक्यता सर्वाधिक राहते. त्यामुळे या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करून शाेधमाेहीम राबवायची आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारीसुद्धा या माेहिमेत सहभागी हाेणार आहेत. दिनांक १ ते १० मार्च या कालावधीत शाेधमाेहीम राबवायची आहे. या शाेधलेल्या शाळाबाह्य मुलांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करायची आहे. दाेन वर्षांपूर्वी अशाप्रकारची माेहीम शासनाने राबवली हाेती, हे विशेष.