शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

जिल्ह्यात केवळ १९ टक्के धान रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:20 IST

गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे दीड लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड दरवर्षी केली जाते. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा अर्धाच पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची छाया गडद : अपेक्षेपेक्षा पावसाची सरासरी निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात साधारणपणे दीड लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड दरवर्षी केली जाते. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा अर्धाच पाऊस झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाल्याची माहिती आहे. दमदार पाऊस होत नसल्याने जिल्हाभरातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात धानाचे एकूण क्षेत्र १ लाख ५३ हजार ९६२ हेक्टर इतके आहे. धानाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर इतके आहे. यापैकी केवळ १० हजार ३३६ हेक्टर क्षेत्रावर भात नर्सरी म्हणजेच पऱ्हे टाकण्याचे काम झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोटारपंप, शेततळे व इतर सिंचन सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांनी काही क्षेत्रात धान पिकाच्या रोवणीचे काम केले आहे.आतापर्यंत जिल्हाभरात केवळ २ हजार ६९ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी झाली आहे. १९ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकल्या आहे. रोवणी व आवत्या मिळून आतापर्यंत २९ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड झाली आहे. १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १९ टक्केच धान पिकाची रोवणी झाली आहे. गडचिरोली तालुक्यात रोवणी व आवत्या मिळून केवळ ७.४९ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड झाली आहे. कुरखेडा तालुक्यात ११.९१ टक्के, आरमोरी ३८.२८, चामोर्शी ८.५७, सिरोंचा १८.६२, अहेरी ४६.६२, एटापल्ली २४.३२, धानोरा २२.०७, कोरची २६.७६, देसाईगंज ६.४१, मुलचेरा ९.४७ व भामरागड तालुक्यात २२.७९ टक्के धान लागवड झाली आहे.दरवर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसतो. या महिन्यात नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याच्या प्रवाहाने भरून जातात. मात्र यंदा अपेक्षेपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहेत. २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही धानपिकाचे पºहे टाकले नाही. पावसाअभावी धान पिकाची पेरणी, रोवणी व इतर कामे लांबणीवर पडली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली असून सर्वसामान्य शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत सापडणार आहेत.४ हजार ७४१ हेक्टरवर तूरवावरी शेतजमिनीत जिल्ह्यातील शेतकरी तूर पिकाची पेरणी करतात. तसेच दरवर्षी खरीप हंगामात धान पिकाच्या शेतीत बांधावर पाळे टाकून तूर पिकाची लागवड केली जाते. जिल्हाभरात एकूण ४ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर यंदा तूर पिकाची लागवड झाली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ७८० हेक्टर कुरखेडा ७३६ हेक्टर, आरमोरी ८८० हेक्टर, चामोर्शी १ हजार २२४ हेक्टर, सिरोंचा ११ हेक्टर, अहेरी १४३ हेक्टर, एटापल्ली ३७ हेक्टर, धानोरा ४५ हेक्टर, कोरची २० हेक्टर, देसाईगंज ४९९ हेक्टर, मुलचेरा ७० हेक्टर व भामरागड तालुक्यात १० हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली आहे.१ हजार ६६७ हेक्टरवर मका पीकगडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण १ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रावर यंदा मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. अहेरी तालुक्यात सर्वाधिक १३६ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी मका पिकाकडे वळले आहे.४ हजार ७५ हेक्टरवर सोयाबिनबाराही तालुके मिळून जिल्हाभरात एकूण ४ हजार ७५ हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरीप हंगामात सोयाबिन पिकाची लागवड करण्यात आली आहे. सोयाबिनची शेती कमी खर्चाची असून परवडणारी असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी या पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत.४ हजार ७१६ हेक्टरवर कापूसकृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना धानपिकासोबतच इतर पिकांच्या लागवडीबाबत सातत्याने मार्गदर्शन होत असल्याने शेतकरी आता बहुपीक घेणे सुरू केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापूस पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदा आतापर्यंत ४ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे. यामध्ये सिरोंचा तालुका आघाडीवर आहे.

टॅग्स :agricultureशेती