शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजाराचे बॅंक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST

सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पालकवर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतातच राबत असतो. त्यामुळे बॅंकेत जाऊन खाते कधी काढावे, असा ...

सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पालकवर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतातच राबत असतो. त्यामुळे बॅंकेत जाऊन खाते कधी काढावे, असा प्रश्न पालकांसमाेर निर्माण झाला आहे. गडचिराेली जिल्ह्यात बॅंकांची संख्या कमी आहे. एटापल्ली, धानाेरा, भामरागड, सिराेंचा या तालुक्यांमधील नागरिकांना बॅंकेसाठी ४० ते ५० किमीचे अंतर पार करावे लागते. अशा स्थितीत हे पालक खरेच बँक खाते काढण्यासाठी बँकेत जाणार काय, असा प्रश्न आहे.

बाॅक्स

खाते आहेत मात्र संख्या कमी

शिष्यवृती व इतर याेजनांसाठी विद्यार्थ्यांचे बॅंकखाते उघडण्यात आले आहेत. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी आहे. ज्यांच्याकडे खाते नाही. त्यांना आता खाते काढावे लागणार आहे. १५६ रुपयांसाठी पालक एक हजार रुपये खर्च करणार नाहीत. खाते न निघाल्यास पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा हाेणार नाहीत.

काेट

केवळ १५६ रुपयेे मिळविण्यासाठी काेणताच पालक एक हजार रुपये खर्च करून बँक खाते काढणार नाही. शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्रित रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करणे आवश्यक हाेते. ही रक्कम मुख्याध्यापक संबंधीत विद्यार्थ्यांचे पालक, भाऊ यांच्या खात्यावर टाकू शकले असते. बँक खाते नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पैशांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करावी.

पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

बाॅक्स

९ जुलैपर्यंत डेडलाईन

ज्या विद्यार्थ्यांचे बॅंक खाते नाहीत त्यांनी ९ जुलैपर्यंत बँक खाते काढायचे आहे. मुख्याध्यापकांनी याची माहिती पंचायत समितीमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करायची आहे. शेतीचा हंगाम आता सुरू आहे. अशा स्थितीत ९ जुलैपर्यंत बँक खाते उघडणार काय, असा प्रश्न आहे.

बाॅक्स

वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

पहिली-१५,४०८

दुसरी-१७,२६३

तिसरी-१६,६५६

चौथी-१६,८३८

पाचवी-१६,१९६

सहावी- १६,२५६

सातवी-१६,९२४

आठवी-१६,११७