शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजाराचे बॅंक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST

सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पालकवर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतातच राबत असतो. त्यामुळे बॅंकेत जाऊन खाते कधी काढावे, असा ...

सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पालकवर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतातच राबत असतो. त्यामुळे बॅंकेत जाऊन खाते कधी काढावे, असा प्रश्न पालकांसमाेर निर्माण झाला आहे. गडचिराेली जिल्ह्यात बॅंकांची संख्या कमी आहे. एटापल्ली, धानाेरा, भामरागड, सिराेंचा या तालुक्यांमधील नागरिकांना बॅंकेसाठी ४० ते ५० किमीचे अंतर पार करावे लागते. अशा स्थितीत हे पालक खरेच बँक खाते काढण्यासाठी बँकेत जाणार काय, असा प्रश्न आहे.

बाॅक्स

खाते आहेत मात्र संख्या कमी

शिष्यवृती व इतर याेजनांसाठी विद्यार्थ्यांचे बॅंकखाते उघडण्यात आले आहेत. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी आहे. ज्यांच्याकडे खाते नाही. त्यांना आता खाते काढावे लागणार आहे. १५६ रुपयांसाठी पालक एक हजार रुपये खर्च करणार नाहीत. खाते न निघाल्यास पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा हाेणार नाहीत.

काेट

केवळ १५६ रुपयेे मिळविण्यासाठी काेणताच पालक एक हजार रुपये खर्च करून बँक खाते काढणार नाही. शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्रित रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करणे आवश्यक हाेते. ही रक्कम मुख्याध्यापक संबंधीत विद्यार्थ्यांचे पालक, भाऊ यांच्या खात्यावर टाकू शकले असते. बँक खाते नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पैशांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करावी.

पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

बाॅक्स

९ जुलैपर्यंत डेडलाईन

ज्या विद्यार्थ्यांचे बॅंक खाते नाहीत त्यांनी ९ जुलैपर्यंत बँक खाते काढायचे आहे. मुख्याध्यापकांनी याची माहिती पंचायत समितीमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करायची आहे. शेतीचा हंगाम आता सुरू आहे. अशा स्थितीत ९ जुलैपर्यंत बँक खाते उघडणार काय, असा प्रश्न आहे.

बाॅक्स

वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

पहिली-१५,४०८

दुसरी-१७,२६३

तिसरी-१६,६५६

चौथी-१६,८३८

पाचवी-१६,१९६

सहावी- १६,२५६

सातवी-१६,९२४

आठवी-१६,११७