शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

राजभाषा सर्वदा स्वीकार्य होवो!

By admin | Updated: February 27, 2015 01:21 IST

भारतीय साहित्यात मराठी साहित्याला आपल्या लेखनीने वैभव प्राप्त करून देणाऱ्या तसेच मराठी साहित्याला आपल्या प्रतिभेने फुलविणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज ...

गोपाल लाजूरकर गडचिरोलीलोकमत दिन विशेषभारतीय साहित्यात मराठी साहित्याला आपल्या लेखनीने वैभव प्राप्त करून देणाऱ्या तसेच मराठी साहित्याला आपल्या प्रतिभेने फुलविणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. वि. वा. शिरवाडकर हे महाराष्ट्राला तात्यासाहेब या नावानेही परिचित आहेत. मराठी साहित्याला दिशा व स्थैर्यदशा त्यांच्याच पाच ते सहा दशकांच्या कार्यकाळात प्राप्त झाली. त्यामुळेच मराठी साहित्यातील कुसुमाग्रजांचे स्थान अग्रणी आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त राजभाषा दिनाच्या रूपाने विविध साहित्य मंडळांमार्फत महाराष्ट्रात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. गडचिरोली जिल्ह्यात दहाहून अधिक भाषा बोलणारे लोक वास्तव्यास आहेत. परंतु येथील प्राथमिक शिक्षण बहुधा मराठी, चामोर्शी तालुक्यात निवडक ठिकाणी बंगाली, देसाईगंज तालुका मुख्यालयात एकमेव उर्दू भाषिक शाळा आहे. छत्तीसगड सीमेलगतच्या भागातही मराठी माध्यमातूनच शिक्षण दिले जाते. त्यामुळे येथील प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षणावर मराठीचाच प्रभाव अधिक आहे. परिणामी इतर भाषांना वाव मिळण्यास कठिणताही अनेकदा आली आहे. तेलंगणा सीमेलगतच्या भागात तेलगू भाषिक बहुसंख्येने आहेत. मात्र या भागात शिक्षण मराठीतूनच दिले जात असल्याने येथील स्थानिकांना अध्ययनात विविध समस्या जाणवतात. परिणामी विद्यार्थी स्वयंअध्ययन करु शकत नाही. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील लोकांना भाषेची अडचण जाणवत असल्याने कुठल्या भाषेतून पाल्यांना शिक्षण द्यावे, असा प्रश्नही त्यांना पडतो. त्यामुळेच या भागातील लोकांना मराठी व सीमावर्ती भागाचा अधिक प्रभाव असणाऱ्या भाषेचेही संवर्धन करावे लागते. मराठी भाषेत विविध भाषांची रसमिसळ होत असल्याने गावपातळीवरील भाषा लुप्त होत आहे. त्यामुळे मराठी भाषेची व्याप्ती वाढविण्याकरिता गावपातळीवरील शब्दांचा समावेश मराठी भाषेत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच मराठीची व्याप्ती व मर्यादाही वाढेल.