शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पालकमंत्र्याच्या नगरीत कार्यालय ओस

By admin | Updated: December 30, 2014 23:36 IST

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र पालकमंत्री अहेरी भागातील असतानाही या भागात शासकीय कार्यालय कर्मचाऱ्याअभावी सध्या

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र पालकमंत्री अहेरी भागातील असतानाही या भागात शासकीय कार्यालय कर्मचाऱ्याअभावी सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. अहेरी उपविभागातील आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. लेखा विभाग वगळता भांडार, यांत्रिकी, संगणक, प्रशासन आदी विभागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती. विजेचे दिवे व पंखे मात्र सुरू होते. हे कार्यालय पूर्णत: रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.या संदर्भात कार्यकारी अभियंता यांना विचारणा करण्यासाठी मंगळवारी प्रयत्न करण्यात आला. तर त्यांनी कर्मचारी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर येथून येत असल्याने ते सोमवारी उशीरा येतात, असे सांगून या कर्मचाऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. अहेरी भागाचे आमदार राज्याचे मंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्या मतदार संघात जर कार्यालयाची अशी अवस्था असेल तर तर जिल्ह्याच्या अन्य कार्यालयाचा विचार न केलेलाच बरा, अशी भावना या परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात बायोमॅट्रीक थंबमशीन देण्यात आली आहे. मात्र ती धुळखात आहे. त्यामुळे कर्मचारी वाटेल तेव्हा येतात व वाटेल तेव्हा जातात, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)