शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

पीक कर्जाचे २२० कोटींचे उद्दिष्ट

By admin | Updated: May 4, 2017 01:29 IST

जिल्हाभरातील बँकांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे २२० कोटी रूपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

२०१७-१८ या वर्षातील खरीप व रब्बी हंगाम गडचिरोली : जिल्हाभरातील बँकांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे २२० कोटी रूपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीपासाठी १९४.६२ कोटी व रब्बीसाठी २५.३८ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. शेतकरीवर्ग आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याने शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारी उभा होऊ नये, यासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांना दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. बँकांच्या मार्फतीने दिले जाणारे कर्ज सावकार व बचतगटाच्या तुलनेत स्वस्त राहत असल्याने शेतकरी सुद्धा पीक कर्ज घेत आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच खरीप आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खरीपासंदर्भातील कामांचा व योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच बँकांना सुमारे २२० कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षीपर्यंत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार होत नव्हता. मात्र ज्या बँका कर्ज देणार नाही, अशा बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मागील वर्षी शासनाने दिले होते. त्यानंतर बँकांनी गावागावात मेळावे घेऊन पीक कर्जाविषयी जागृती केली. पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे याविषयीची माहिती दिली. आता शेतकऱ्यांमध्ये पीक कर्जाविषयीची जागृती आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग स्वत:हून पीक कर्ज घेण्यासाठी पुढे येत आहे. दरवर्षी कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. पूर्वी रब्बी पिकासाठी शेतकरी कर्ज घेत नव्हते. आता मात्र रब्बी पिकासाठीही कर्ज घेत आहेत. खरीप पिकामध्ये सूर्यफूल, उन्हाळी तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध बाबींवर शेतकऱ्याला खर्च करावा लागतो. धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने खरीप हंगामासाठी सर्वाधिक पीक कर्जाची मागणी होते. त्यामुळे खरीपासाठी उद्दिष्टही अधिकचे ठरविण्यात आले आहे. २०१७-१८ च्या हंगामात शेतकऱ्यांना १९४.६२ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. उद्दिष्ट जरी दिले असले तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र बघायला मिळते. काही बँका केवळ कारवाई वाचविण्यासाठी निवडकच शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याचेही समोर आले आहे. (नगर प्रतिनिधी) शून्य टक्के व्याज दराने कर्ज वाटप मागील १० वर्षांपासून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज वाटप केले जात आहे. जवळपास एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत कर्जाचे पैसे वापरता येतात. त्यामुळे शेतकरी वर्ग बँकेच्या मार्फतीने कर्जाची उचल करण्याकडे विशेष भर देत असल्याचे दिसून येत आहे. दुर्गम भागातील शेतकरी कर्जाचे ओझे नको, म्हणून कर्ज घेण्यास तयार होत नाही. धानाचे पीक झाले नाही तर कर्ज भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काही शेतकरी मात्र कर्ज घेण्यास तयार होत नाही.