शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण १८ टक्के होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:55 IST

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण ६ टक्क्यांवरून लवकरच १८ टक्के केले जाईल, जिल्ह्यात मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण कमी ...

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण ६ टक्क्यांवरून लवकरच १८ टक्के केले जाईल, जिल्ह्यात मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण कमी करून ते ओबीसी समाजाला लागू केले जाईल, अवघ्या महिनाभरातच त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिली. ओबीसी समाजाच्या अनेक न्याय्य मागण्यांसाठी दिनांक २२ रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्याची तयारी सुरू होती. अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवत सहभागी होण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे आणि या मोर्चात एक लाखावर लोकांचा सहभाग राहण्याची शक्यता असल्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र, त्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहावर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यापुढे आपल्या मागण्या मांडत शासन दरबारी त्यावर निर्णय घेण्याची विनंती केली. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के होत नाही तोपर्यंत कोणतीही पदभरती करु नये अन्यथा ओबीसी समाज कोरोनाच्या उद्रेकाला न जुमानता रस्त्यावर उतरेल, असे समन्वय समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यावर आरक्षण पूर्ववत करूनच पदभरती करू, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले. केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करत नसेल तर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करण्यासाठी आघाडी सरकार विधीमंडळात ठराव आणेल, असेही ते म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकारकडे ओबीसींची जनगणना करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली.

यावेळी अनिल पाटील म्हशाखेत्री, सुरेश सावकार पोरेड्डीवार, प्रा.शेषराव येलेकर, महेंद्र ब्राह्मणवाडे, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, सतीश विधाते, मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोड, रमेश भुरसे, प्रभाकर वासेकर, दादाजी चुधरी, दादाजी चापले, रेखा डोळस, सोनाली पुण्यपवार, पुष्पा करकाडे, अरुण मुनघाटे, लोकमान्य बरडे, धनपाल मिसार, अतुल बोमनवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

... तर पेसात राहतील केवळ २१८ गावे

यावेळी माहिती देताना भाजपच्या ओबीसी संघर्ष कृती समितीचे संयोजक बाबुराव कोहळे यांनी तत्कालीन राज्यपालांनी ३० ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या अध्यादेशाकडे लक्ष वेधले. त्या अध्यादेशानुसार, ज्या अनुसूचित क्षेत्रातील गावात आदिवासींची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा जास्त आहे त्याच गावांमधील (पेसा) रिक्त पदे १०० टक्के आदिवासी प्रवर्गातून भरावीत. मात्र २५ ते ५० टक्के आदिवासी लोकसंख्या असेल त्या गावात ५० टक्के पदे आदिवासी समाजासाठी तर २५ टक्केपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये २५ टक्केच पदे आदिवासी समाजासाठी (अनुसूचित जमाती) राखीव ठेवावी, असे स्पष्टपणे नमूद आहे. पण त्याची अंमलबजावणीच झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील केवळ २१८ गावे पेसा क्षेत्रात (५० टक्केपेक्षा जास्त आदिवासीबहुल) राहतील, असेही कोहळे म्हणाले.