शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

ओबीसी महामाेर्चा निघणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST

गडचिराेली : काेराेनाचे कारण पुढे करीत पाेलीस प्रशासनाने माेर्चाला परवानगी देण्यास नकार दिला असला तरी २२ तारखेचा नियाेजित माेर्चा ...

गडचिराेली : काेराेनाचे कारण पुढे करीत पाेलीस प्रशासनाने माेर्चाला परवानगी देण्यास नकार दिला असला तरी २२ तारखेचा नियाेजित माेर्चा निघेलच, असा निर्धार १४ फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या ओबीसी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत व्यक्त केला आहे. २२ तारखेचा ओबीसींचा माेर्चा ऐतिहासिक व्हावा, यासाठी ओबीसी समाज संघटना मागील १५ दिवसापासून कामाला लागली आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. माेर्चाला परवानगी मिळावी, यासाठी पाेलीस प्रशासनाकडे अर्ज केला हाेता. मात्र पाेलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ओबीसी समाजात माेर्चाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. माेर्चा निघणार की नाही, याविषयी शंका-कुशंका उपस्थित केल्या जात हाेत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ओबीसी समन्वय समितीची तातडीची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत माेर्चाविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांनी माेर्चा निघेलच, असा सर्वानुमते निर्णय घेतला. माेर्चा अतिशय शांततेत काढला जाईल, माेर्चेकरी काेराेना प्रतिबंधाविषयीचे नियम पाळतील. यादृष्टीने प्रयत्न केले जातील. शांततेच्या मार्गाने सरकारला ओबीसी समाजाची ताकद, ऐक्य दाखवायचे आहे. त्यादृष्टीने सर्व ओबीसी बांधवांनी मनात काेणतीही शंका न बाळगता माेर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीच्या सदस्यांनी केले आहे.

बाॅक्स ......

शेतकरी माेर्चालाही परवानगी नाही

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काेणत्याच माेर्चाला परवानगी देत नाही. एवढेच नाही तर दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या माेर्चालासुद्धा परवानगी नाही, तरीही हा माेर्चा मागील महिनाभरापासून सुरू आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या कालावधीत एकाही माेर्चाला परवानगी नव्हती. तरीही हजाराेच्या संख्येतील माेर्चे काढण्यात आले आहेत. एकाही माेर्चेकऱ्यावर प्रशासनाने कारवाई केली नाही. उलट पाेलीस बंदाेबस्त ठेवून माेर्चा शांततेत पार पडेल, यासाठी सहकार्य केले असल्याचे दिसून येते. ओबीसी समाज संघटनेने माेर्चाची परवानगी मागितली हाेती. त्याला उत्तर म्हणून प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. हा एक नियमाचा भाग आहे. मात्र याला ओबीसी समाजाने घाबरून जाऊ नये. पाेलीस विभाग व इतर विभागसुद्धा माेर्चा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करतील, अशी अपेक्षा बैठकीतील सदस्यांनी व्यक्त केली आहे.