शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आता वीकेंड घरातच, जिल्ह्यात हाॅटेलिंग व्यवसाय राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

गडचिराेली : एक जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका लक्षात ...

गडचिराेली : एक जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका लक्षात घेऊन डेल्टामुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड हाॅटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. तिसऱ्या लाटेचा धाेका निर्माण झाल्याने बाजारपेठेतील गर्दी राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, साेमवारपासून सायंकाळी चार वाजेनंतर जवळपास सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी हाेत आहे. असे असतानाही बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता, काेराेनाची तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. त्यामुळे आतापासून निर्बंध कडक करण्यात आले आहे. गडचिराेली शहरात धानाेरा, आरमाेरी मार्ग, काॅम्प्लेक्स परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक व इतर सर्व ठिकाणची मिळून जवळपास २७ छाेटी-माेठी हाॅटेल आहेत. या हाॅटेलमध्ये भाेजनाची व्यवस्था आहे. काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यानही शासनाच्या निर्बंधानुसार हाॅटेल व्यवसाय अनेक महिने बंद राहिले. काही महिने केवळ पार्सल सेवा सुरू केली हाेती. आता शासनाच्या नव्या नियमानुसार गडचिराेली शहर व जिल्ह्यातील सर्व हाॅटेल सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहणार आहे.

बाॅक्स

खरी उलाढाल हाेते सायंकाळलाच

गडचिराेली जिल्ह्यात पाेलीस विभागात अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानही आहेत. तसेच विविध विभागातील जिल्ह्याच्या बाहेरील कर्मचारी आपल्या कुटुंबाला साेडून एकटेच ड्युटीच्या निमित्ताने गडचिराेलीत राहत आहेत. ते सुटीच्या दिवशी भाेजनालयात जाऊन खास भाेजनाचा आस्वाद घेण्यावर भर देत असतात. सायंकाळी व रात्रीच भाेजनासाठी हाॅटेलात गर्दी हाेत असते.

काेट

हाॅटेल व्यवसाय कधी उभा राहणार?

गेल्या दीड वर्षापासून हाॅटेल व्यवसाय डबघाईला आला आहे. काेराेना संकटामुळे या व्यवसायावर फार माेठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी सुरू झालेला व्यवसाय काेराेनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद हाेण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आम्हा हाॅटेल व्यावसायिकांचे माेठे नुकसान हाेत आहे. शासनाने करात सूट द्यावी.

- चंद्रकांत पतरंगे,

हाॅटेल व्यावसायिक

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी ४ वाजतानंतर हाॅटेल बंद ठेवावे लागणार आहे; पण यातून वीज बिल, भाडे, परवाना शुल्क भरून निघणे कठीण आहे. हाॅटेल व्यवसायावर अनेकांचा राेजगार अवलंबून आहे. हाॅटेल बंद पडल्यास त्यांचा राेजगार हिरावला जाईल. सरकारने मदत द्यावी.

- प्रवीण भाेयर,

हाॅटेल व्यावसायिक