शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

आता वीकेंड घरातच, जिल्ह्यात हाॅटेलिंग व्यवसाय राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

गडचिराेली : एक जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका लक्षात ...

गडचिराेली : एक जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका लक्षात घेऊन डेल्टामुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड हाॅटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. तिसऱ्या लाटेचा धाेका निर्माण झाल्याने बाजारपेठेतील गर्दी राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, साेमवारपासून सायंकाळी चार वाजेनंतर जवळपास सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी हाेत आहे. असे असतानाही बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता, काेराेनाची तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. त्यामुळे आतापासून निर्बंध कडक करण्यात आले आहे. गडचिराेली शहरात धानाेरा, आरमाेरी मार्ग, काॅम्प्लेक्स परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक व इतर सर्व ठिकाणची मिळून जवळपास २७ छाेटी-माेठी हाॅटेल आहेत. या हाॅटेलमध्ये भाेजनाची व्यवस्था आहे. काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यानही शासनाच्या निर्बंधानुसार हाॅटेल व्यवसाय अनेक महिने बंद राहिले. काही महिने केवळ पार्सल सेवा सुरू केली हाेती. आता शासनाच्या नव्या नियमानुसार गडचिराेली शहर व जिल्ह्यातील सर्व हाॅटेल सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहणार आहे.

बाॅक्स

खरी उलाढाल हाेते सायंकाळलाच

गडचिराेली जिल्ह्यात पाेलीस विभागात अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानही आहेत. तसेच विविध विभागातील जिल्ह्याच्या बाहेरील कर्मचारी आपल्या कुटुंबाला साेडून एकटेच ड्युटीच्या निमित्ताने गडचिराेलीत राहत आहेत. ते सुटीच्या दिवशी भाेजनालयात जाऊन खास भाेजनाचा आस्वाद घेण्यावर भर देत असतात. सायंकाळी व रात्रीच भाेजनासाठी हाॅटेलात गर्दी हाेत असते.

काेट

हाॅटेल व्यवसाय कधी उभा राहणार?

गेल्या दीड वर्षापासून हाॅटेल व्यवसाय डबघाईला आला आहे. काेराेना संकटामुळे या व्यवसायावर फार माेठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी सुरू झालेला व्यवसाय काेराेनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद हाेण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आम्हा हाॅटेल व्यावसायिकांचे माेठे नुकसान हाेत आहे. शासनाने करात सूट द्यावी.

- चंद्रकांत पतरंगे,

हाॅटेल व्यावसायिक

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी ४ वाजतानंतर हाॅटेल बंद ठेवावे लागणार आहे; पण यातून वीज बिल, भाडे, परवाना शुल्क भरून निघणे कठीण आहे. हाॅटेल व्यवसायावर अनेकांचा राेजगार अवलंबून आहे. हाॅटेल बंद पडल्यास त्यांचा राेजगार हिरावला जाईल. सरकारने मदत द्यावी.

- प्रवीण भाेयर,

हाॅटेल व्यावसायिक