शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढीसाठी आता सात कलमी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:23 IST

शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देदुप्पट वाढीचे लक्ष्य : शेतीसह प्रक्रिया उद्योगाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्रासह कृषी विभागाकडून पुरविले जाईल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र सोनापूर (गडचिरोली)चे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प ते सिद्धी’ या कार्यक्रमाचे आयोजन येत्या ३१ आॅगस्टला गडचिरोलीत करण्यात आले आहे. त्यात शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी राबविल्या जाणाºया सात कलमी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम राबविताना समन्वयकाची भूमिका कृषी विज्ञान केंद्राला पार पाडायची आहे. शेतकºयांमध्ये जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सदर कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राकडे देण्यात आली असल्याचे डॉ.तांबे यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी राबवायच्या सात कलमी कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाकडून केले जाणार आहे.त्याबाबत अधिक माहिती देताना डॉ.तांबे यांनी सांगितले, गडचिरोली जिल्ह्यात दुग्ध उत्पादनासह इतर अनेक गोष्टीतून उत्पन्न वाढीसाठी भरपूर वाव आहे. परंतू पुरेशा माहितीचा अभाव आणि गैरसमज यामुळे लोक त्याकडे वळलेले नाहीत. त्यांना यासाठी प्रवृत्त करून आधुनिक शेतीकडे त्यांचा कल वाढविणे, चांगले बियाणे शेतकºयांना मिळतील यासाठी त्यांची गुणवता वेळोवेळी तपासून शेतकºयांची फसवणूक थांबविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.३१ आॅगस्टला होणाºया कार्यक्रमात शेतकºयांना कृषी शास्त्रज्ञांचेही मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ.डी.एम. मानकर राहणार आहेत. पत्रपरिषदेला डॉ.विजय कदम, ज्ञानेश्वर नाथाडे, डॉ.अनिल तारू, योगिता सानप, पुष्पक बोथीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.