शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

३० नोव्हेंबरला विदर्भदिंडी कालेश्वरवरून निघणार

By admin | Updated: October 21, 2016 01:21 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ दिंडीचे नियोजन करण्यात आले.

वामनराव चटप यांचे नेतृत्व : अहेरी येथे नियोजनाची झाली सभा; जिल्ह्यात जनजागृती करणारअहेरी : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ दिंडीचे नियोजन करण्यात आले. ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी आ. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी येथे झालेल्या सभेला माजी मंत्री रमेश गजबे, जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, जिल्हा सहसमन्वयक रघुनाथ तलांडे, चंद्रशेखर गडसुलवार, रमेश उपलवार, समया पसुला आदी उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना वामनराव चटप म्हणाले की, आजवर विदर्भ राज्याच्या मागणीची गंमतच करण्यात आली. आश्वासनाच्या व्यतिरिक्त वैदर्भिय नेत्यांच्या पदरी काहीही पडले नाही. आगामी काळात विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक प्रखरपणे राबवून स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविले जाईल. विदर्भ राज्य दिंडीला सिरोंचा जवळील कालेश्वर येथून ३० नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सीमा शिवरकर, ममता उईके, अर्चना निष्ठुरवार, पार्वता मडावी, नागू आत्राम, बुधाजी सिडाम, श्रीनिवास भंडारी, विलास रापर्तीवार आदी उपस्थित होते.यावेळी दक्षिण गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नागसेन मेश्राम, सचिव म्हणून प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, महिला आघाडी सदस्य म्हणून माजी जि. प. अध्यक्ष आशा पोहणेकर, उपाध्यक्ष यशोधरा गुरनुले यांची निवड करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)स्वतंत्र राज्याशिवाय विकास अशक्य- वामनराव चटपविदर्भाची मागणी ११३ वर्ष जुनी आहे. विदर्भाचा विकास कुणीही केला नाही. केवळ शोषणच केले आहे. विदर्भाच्या भरवशावर पश्चिम महाराष्ट्र श्रीमंत झाला. ७० टक्के वीज विदर्भात निर्माण होते व तिचा वापर मुंबई, पुण्याचे उद्योजक करतात. विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी स्वतंत्र राज्य होणे गरजेचे आहे. याशिवाय विकास शक्य नाही, असे प्रतिपादन माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. चामोर्शी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री रमेश गजबे, जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, चंद्रशेखर गडसुलवार, रमेश भुरसे, मंदा तुरे, प्रा. रमेश बारसागडे, देवाजी बुरांडे, वैष्णवी राऊत, कल्पना गजभिये, प्रा. रामचंद्र वासेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. रमेश बारसागडे, अरूण पाटील मुनघाटे, रमेश गजबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष पी. जे. सातार, संचालन कृष्णा नैताम, आभार मनमोहन बंडावार यांनी मानले. मेळाव्याला आष्टी, येनापूर, घोट, कुनघाडा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)