शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

‘एसटी’त गैर आदिवासी नको

By admin | Updated: August 4, 2014 23:45 IST

आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण देऊन मूलभूत अधिकार दिला आहे. त्यामुळे आदिवासी समाज विकासाच्या प्रवाहात समाविष्ट होत आहे.

आंदोलनाची चेतावणी : १२ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चागडचिरोली : आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण देऊन मूलभूत अधिकार दिला आहे. त्यामुळे आदिवासी समाज विकासाच्या प्रवाहात समाविष्ट होत आहे. परंतु काही गैर आदिवासी समाज आदिवासी समाजात समाविष्ट होऊ पाहत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होणार आहे. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. या विरोधात १२ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.आदिवासींना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून घटनेत तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून जंगल व दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. परंतु काही गैर आदिवासी संवर्गातील नेते अनुसूचित जमातीचे आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यांच्या आरक्षणाला आदिवासी संघटनांचा विरोध नाही, परंतु धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश नको. यापूर्वीही अनेकांनी आदिवासी असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या बळकावल्या आहेत. त्यांना सेवेतून कमी करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी वारंवार केली आहे. शासनाने कारवाई करून अनेकांना सेवेतून कमी केले आहे. संविधानाने आदिवासींना दिलेल्या आरक्षणाच्या मूलभूत हक्कावर गैर आदिवासी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आदिवासींवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.धनगर व अन्य जातींना आदिवासी समाजात समाविष्ट करू नये, गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींसाठी असलेले २४ टक्के आरक्षण कायम ठेवण्यात यावे, नोकरीमध्ये आदिवासींनाच संधी देण्यात यावी, १५ जून १९९५ चा बोगस आदिवासींना संरक्षण देणारा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात यावे, गडचिरोली जिल्ह्याचे वनक्षेत्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येऊ नये, शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत ५० हजारांच्या आत उत्पन्न असलेल्या आदिवासींना बिनशर्त योजनांचा लाभ देऊन अनुदानाची मर्यादा दोन लाखांपर्यंत करण्यात यावी आदी प्रमुख मागण्या आदिवासी समाजाच्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी १२ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध आदिवासी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार आहे. पत्रपरिषदेला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी, बिरसा सेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन मसराम, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे भरत येरमे, पी. टी. मसराम, लोकचंद बाळापुरे, डॉ. कोवे, बंडू तिलगामे, पद्माकर मानकर, गुलाब मडावी, सदानंद ताराम, मुकेश नरोटे, होळी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)