शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

प्रवाशांनी जंगलात काढली रात्र!

By admin | Updated: August 30, 2015 01:07 IST

आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुडकेली नाल्यावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-लाहेरी बसमधील प्रवाशांना शुक्रवारची रात्र जंगलातच काढावी लागली.

नातेवाईक चिंतेत : कुडकेली नाल्यावरील पाण्यामुळे लाहेरी बस रात्रभर अडकलीभामरागड : आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुडकेली नाल्यावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-लाहेरी बसमधील प्रवाशांना शुक्रवारची रात्र जंगलातच काढावी लागली. सदर बस शनिवारी सकाळी ६ वाजता भामरागड येथे पोहोचली. रात्रभर बस न आल्याने प्रवाशांचे नातेवाईक चिंतातुर झाले होते. शेकडो कर्मचारी, नागरिक भामरागडला जात असल्याने गडचिरोली आगाराने गडचिरोली-लाहेरी ही स्वतंत्र बस सुरू केली आहे. सदर बस लाहेरी येथे मुक्कामी राहते. सदर बस गडचिरोलीवरून दुपारी अडीच वाजता सोडण्यात येते. आलापल्लीला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पोहोचते. त्यानंतर भामरागडसाठी पुढचा प्रवास सुरू होतो. ही बस लाहेरी येथे रात्री ९ वाजताच्या सुमारास पोहोचते. त्यामुळे या बसने अनेक प्रवासी प्रवास करतात. या बसवर नेहमीच गर्दी राहते. नेहमीप्रमाणेच गडचिरोली आगारातून एमएच-४०८९७९ ही बस २.३० वाजताच्या सुमारास प्रवासी घेऊन निघाली. सायंकाळच्या सुमारास अहेरी, भामरागड तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या कुडकेली नाल्यावरील पुलावरून पाणी वाहने सुरू झाले. रात्रीची वेळ होती. त्यामुळे पुलावरून बस टाकल्यास दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाल्यावरील पूर उतरेपर्यंत वाट बघण्याचा निर्णय बसचालक बन्सोड, बस वाहक व्ही. मडावी व बसमधील प्रवाशांनी घेतला. लहान नाले असल्याने अगदी तासात पूर ओसरतो, हा या परिसरातील प्रवाशांना आजपर्यंत आलेला अनुभव आहे. मात्र रात्रभर पाऊस पडत असल्याने पूर ओसरला नाही. परिणामी प्रवाशांना पूर ओसरण्याची वाट बघत संपूर्ण रात्र जंगलातच काढावी लागली. पहाटेच्या सुमारास पूर ओसरल्यानंतर सदर बस भामरागड येथे सकाळी ६ वाजता पोहोचली. या बसमध्ये येत असलेल्या तेजस्विनी या मुलीची वाट बघत तिचे आई-वडील रात्रभर भामरागड येथील चौकात थांबले होते. आलापल्लीवरून निघालेली बस रात्रभर न पोहोचल्याने आई-वडील चिंतेत सापडले होते. जंगलात फोनही लागत नसल्याने चिंता आणखीच वाढली होती. या मार्गावर अनेक नाले आहेत. त्यावरील पूल उंचीने अत्यंत ठेंगणे असल्याने असे प्रकार घडत आहेत. याचा प्रचंड त्रास भामरागड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)