शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन लाडज, आमगावात सिंचनाची आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:49 IST

देसाईगंजपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन विभागाचा मुख्य कालवा वाहताे. तरीसुद्धा पुनर्वसित नवीन लाडज व आमगाव ...

देसाईगंजपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन विभागाचा मुख्य कालवा वाहताे. तरीसुद्धा पुनर्वसित नवीन लाडज व आमगाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली नाही. सिंचनाची सोय उपलब्ध उपलब्ध व्हावी, याकरिता १९९२ पासून शेतकरी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याची दखल घेत कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह सिंचन व्यवस्थापन विभाग गोंदिया यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय समितीने मोक्का चौकशी केली. विशेष म्हणजे, जवळपास ३०० शेतकरी १९९२ पासून सिंचनाची साेय निर्माण करावी, अशी मागणी करीत आहेत. दरम्यान, नवीन नहर बांधकामात १९८०चा वनसंवर्धन कायदा अडसर ठरू नये यासाठी आमगाव ग्राम पंचायतीने २७ जानेवारी २०२०ला नहराकरिता वनजमिनीची मान्यता मिळविण्यासाठी सर्वानुमते ठराव घेतला. आमदार कृष्णा गजबे यांनीही शासनाकडे मागणी केली हाेती.

वैनगंगा उप कालवा १२,४०० किमी निरीक्षण पथ ते भूमापन क्रमांक ८०८ पर्यंत एकूण १ किमी लांबीच्या अंतराच्या नवीन कालवा बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून बांधकाम अंदाज पत्रकाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्य अभियंता नागपूर यांनी २४ फेब्रुवारीला कार्यकारी अभियंता गोंदिया यांना निर्देश दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता भिवगडे, उपविभागीय अभियंता मेंढे, प्रकल्प अध्यक्ष सोरते, कनिष्ठ अभियंता सहारे, सर्वेअर मेंढे, सर्वेअर शेंडे, आकाश मोहुर्ले यांनी मोक्यावर पाहणी केली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

बाॅक्स

२००८ पासून कार्यालयीन कार्यवाही

सिंचन साेयीच्या मागणीसाठी नवीन लाडज व आमगावातील शेतकऱ्यांनी ११ ऑक्टाेबर २००८ राेजी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल जल संपदा विभागाने घेऊन २३ डिसेंबर २००८ राेजी मुख्य अभियंता जल संपदा विभाग नागपूर यांना पत्र व्यवहार करून ताबडतोब अहवाल मागितला. त्यानुसार अधीक्षक अभियंता नागपूर यांनी नवीन नहर प्रस्ताव अहवाल प्राधिकरणकडे लवकर सादर करावे, असे निर्देश दि. ३ जानेवारी २००९ राेजी दिले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया यांनी सहायक अभियंता उपविभाग देसाईगंज यांना दि. ९ एप्रिल २००९ राेजी कार्यालयाला लेखी अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. उपविभागीय अभियंता देसाईगंज यांनी पाठवलेल्या अहवालात वैनगंगा उप कालव्यावर नवीन नहर दिल्यास सुमारे २६० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल, असे अहवालात मान्य केले हाेते.२००८ पासून या प्रकरणात कार्यवाही अत्यंत संथगतीने सुरू हाेती.