शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नवीन लाडज, आमगावात सिंचनाची आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:49 IST

देसाईगंजपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन विभागाचा मुख्य कालवा वाहताे. तरीसुद्धा पुनर्वसित नवीन लाडज व आमगाव ...

देसाईगंजपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन विभागाचा मुख्य कालवा वाहताे. तरीसुद्धा पुनर्वसित नवीन लाडज व आमगाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली नाही. सिंचनाची सोय उपलब्ध उपलब्ध व्हावी, याकरिता १९९२ पासून शेतकरी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याची दखल घेत कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह सिंचन व्यवस्थापन विभाग गोंदिया यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय समितीने मोक्का चौकशी केली. विशेष म्हणजे, जवळपास ३०० शेतकरी १९९२ पासून सिंचनाची साेय निर्माण करावी, अशी मागणी करीत आहेत. दरम्यान, नवीन नहर बांधकामात १९८०चा वनसंवर्धन कायदा अडसर ठरू नये यासाठी आमगाव ग्राम पंचायतीने २७ जानेवारी २०२०ला नहराकरिता वनजमिनीची मान्यता मिळविण्यासाठी सर्वानुमते ठराव घेतला. आमदार कृष्णा गजबे यांनीही शासनाकडे मागणी केली हाेती.

वैनगंगा उप कालवा १२,४०० किमी निरीक्षण पथ ते भूमापन क्रमांक ८०८ पर्यंत एकूण १ किमी लांबीच्या अंतराच्या नवीन कालवा बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून बांधकाम अंदाज पत्रकाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्य अभियंता नागपूर यांनी २४ फेब्रुवारीला कार्यकारी अभियंता गोंदिया यांना निर्देश दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता भिवगडे, उपविभागीय अभियंता मेंढे, प्रकल्प अध्यक्ष सोरते, कनिष्ठ अभियंता सहारे, सर्वेअर मेंढे, सर्वेअर शेंडे, आकाश मोहुर्ले यांनी मोक्यावर पाहणी केली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

बाॅक्स

२००८ पासून कार्यालयीन कार्यवाही

सिंचन साेयीच्या मागणीसाठी नवीन लाडज व आमगावातील शेतकऱ्यांनी ११ ऑक्टाेबर २००८ राेजी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल जल संपदा विभागाने घेऊन २३ डिसेंबर २००८ राेजी मुख्य अभियंता जल संपदा विभाग नागपूर यांना पत्र व्यवहार करून ताबडतोब अहवाल मागितला. त्यानुसार अधीक्षक अभियंता नागपूर यांनी नवीन नहर प्रस्ताव अहवाल प्राधिकरणकडे लवकर सादर करावे, असे निर्देश दि. ३ जानेवारी २००९ राेजी दिले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया यांनी सहायक अभियंता उपविभाग देसाईगंज यांना दि. ९ एप्रिल २००९ राेजी कार्यालयाला लेखी अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. उपविभागीय अभियंता देसाईगंज यांनी पाठवलेल्या अहवालात वैनगंगा उप कालव्यावर नवीन नहर दिल्यास सुमारे २६० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येईल, असे अहवालात मान्य केले हाेते.२००८ पासून या प्रकरणात कार्यवाही अत्यंत संथगतीने सुरू हाेती.