शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भामरागडच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 31, 2014 00:01 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले व विकासाचे आश्वासन दिले. परंतु हे सारे हवेतच विरले आहे.भामरागडच्या विकासाचे चित्र मात्र बदलले नाही. १०० टक्के आदिवासी गाव असलेला भामरागड हा तालुका आहे. अनेकदा समस्यांच्याबाबत आंदोलन झालीत. परंतु त्यातून काहीही हाती पडले नाही. पावसाळा आला की, इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा यांना नद्या तुडुंब भरून वाहतात. येथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागतो. मागील दोन दशकापासून पुराच्या या समस्येमुळे भामरागडचे नागरिक त्रस्त आहेत. १९८६ मध्ये महापूर येऊन भामरागडला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. भामरागडच्या १०० ते ८० गावाचा संपर्क पुरामुळे दरवर्षी तुटतो. भामरागडच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही आपले दुकान हलवावे लागते. पोलीस ठाण्याच्या समोरून पुराच्या पाण्याचा नाला वाहतो व रस्ते बंद होऊन जातात. ठेंगणे व अरूंद पूल असल्याने अनेक दिवस पुलावरचे पाणीही उतरत नाही. आरेवाडा, कोठी येथील नाले भरून वाहत असल्याने रस्ता बंद पडून जातो. नागरिकांना उपचारासाठीसुध्दा भामरागडला येणे पावसाळ्यात कठीण होऊन जाते. मागील २० वर्षापासून ही समस्या आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेली नाही. पालकमंत्री उपमुख्यमंत्री २००६ मध्ये येथे आले होते. आढावा बैठक घेतली. पर्लकोटाचा ठेंगणा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर काहीही झाले नाही. पुराचे पाणी राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत येते. ५ दिवस जनजीवन विस्कळीत होते. नव्या पुलाच्या बांधकामाकडे तसेच ठेंगणे व अरूंद रपटे रूंद करण्याकडे लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष आहे. कुमरगडा, ताडगाव, नारगुंडा हे मार्ग दरवर्षीच बंदच होऊन जातात. अनेतदा बांधकाम विभाग तुटलेले पूल व खचलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी येत नाही. नागरिक व पोलीस श्रमदान करून रस्ते तयार करतात व कशीतरी बससेवा सुरू करून घेतात. भामरागडच्या या समस्येवर कधीतरी कायम तोडगा निघेल काय, हाच खरा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)