शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 31, 2014 00:01 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले व विकासाचे आश्वासन दिले. परंतु हे सारे हवेतच विरले आहे.भामरागडच्या विकासाचे चित्र मात्र बदलले नाही. १०० टक्के आदिवासी गाव असलेला भामरागड हा तालुका आहे. अनेकदा समस्यांच्याबाबत आंदोलन झालीत. परंतु त्यातून काहीही हाती पडले नाही. पावसाळा आला की, इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा यांना नद्या तुडुंब भरून वाहतात. येथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागतो. मागील दोन दशकापासून पुराच्या या समस्येमुळे भामरागडचे नागरिक त्रस्त आहेत. १९८६ मध्ये महापूर येऊन भामरागडला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. भामरागडच्या १०० ते ८० गावाचा संपर्क पुरामुळे दरवर्षी तुटतो. भामरागडच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही आपले दुकान हलवावे लागते. पोलीस ठाण्याच्या समोरून पुराच्या पाण्याचा नाला वाहतो व रस्ते बंद होऊन जातात. ठेंगणे व अरूंद पूल असल्याने अनेक दिवस पुलावरचे पाणीही उतरत नाही. आरेवाडा, कोठी येथील नाले भरून वाहत असल्याने रस्ता बंद पडून जातो. नागरिकांना उपचारासाठीसुध्दा भामरागडला येणे पावसाळ्यात कठीण होऊन जाते. मागील २० वर्षापासून ही समस्या आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेली नाही. पालकमंत्री उपमुख्यमंत्री २००६ मध्ये येथे आले होते. आढावा बैठक घेतली. पर्लकोटाचा ठेंगणा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर काहीही झाले नाही. पुराचे पाणी राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत येते. ५ दिवस जनजीवन विस्कळीत होते. नव्या पुलाच्या बांधकामाकडे तसेच ठेंगणे व अरूंद रपटे रूंद करण्याकडे लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष आहे. कुमरगडा, ताडगाव, नारगुंडा हे मार्ग दरवर्षीच बंदच होऊन जातात. अनेतदा बांधकाम विभाग तुटलेले पूल व खचलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी येत नाही. नागरिक व पोलीस श्रमदान करून रस्ते तयार करतात व कशीतरी बससेवा सुरू करून घेतात. भामरागडच्या या समस्येवर कधीतरी कायम तोडगा निघेल काय, हाच खरा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)