शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जातीय विषमता मोडीत काढणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:49 IST

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : मानवाच्या निर्मितीत जातीयवादाला कुठेही थारा नसताना व्यवसायाच्या आधारावर जातीय व्यवस्था निर्माण करुन बहुजनांना भावनेचे गुलाम बनवून आपल्या ईशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडून त्यांना सामाजिक, नैतिक आणि आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. हे षडयंत्र बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी बाधक असल्याने जातीय विषमता मोडीत काढण्यासाठी संघटित होणे काळाची ...

ठळक मुद्देनागेश चौधरी यांचे प्रतिपादन : देसाईगंजात कुणबी समाजाचा मेळावा

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : मानवाच्या निर्मितीत जातीयवादाला कुठेही थारा नसताना व्यवसायाच्या आधारावर जातीय व्यवस्था निर्माण करुन बहुजनांना भावनेचे गुलाम बनवून आपल्या ईशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडून त्यांना सामाजिक, नैतिक आणि आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. हे षडयंत्र बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी बाधक असल्याने जातीय विषमता मोडीत काढण्यासाठी संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विचारवंत नागेश चौधरी यांनी केले.देसाईगंज येथील हटवार मंगल कार्यालयात कुणबी-ओबीसी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागेश चौधरी बोलत होते. मेळाव्याला देसाईगंज न.प.च्या नगराध्यक्षा शालू दंडवते, ब्रह्मपुरीच्या सहायक पोलीस निरीक्षक देवयानी पारधी नाकतोडे, वैज्ञानिक पंकज रामजी धोटे, प्रा. दामू शिंगाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.मार्गदर्शन करताना चौधरी पुढे म्हणाले की, या देशातील बहुजन समाज कष्टकरी, कामगार वर्गात विखुरल्या गेला आहे. या वर्गातील बहुसंख्य नागरिक व त्यांची पाल्ये शिकुच नयेत, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. मंडल आयोग, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. या देशातील बहुजन समाजाला जागृतीच्या प्रवाहात येऊच नये यासाठी विरोधी संघटना सक्रिय आहेत. त्यांच्या संघटित षडयंत्रामुळेच देशातील असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचे भयाणक वास्तव आहे. तरीही बहुजन समाज मानवतेच्या आधारावर संघटित न होता जातियवादाच्या राजकारणात विखुरल्या जात आहे, ही बहुजन समाजासाठी धोक्याची घंटा असुन नोकरी मिळते म्हणून शिकु नका तर न्याय हक्काने अधिकार मिळवण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाजात पर्यायाने देशात समतेवर आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी जातीय विषमता मोडीत काढून मानवतेच्या आधारावर लढा उभा करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रदीप तुपट, प्रास्ताविक नरेश चौधरी, आभार दिलीप नाकाडे यांनी मानले.