शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जातीय विषमता मोडीत काढणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:49 IST

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : मानवाच्या निर्मितीत जातीयवादाला कुठेही थारा नसताना व्यवसायाच्या आधारावर जातीय व्यवस्था निर्माण करुन बहुजनांना भावनेचे गुलाम बनवून आपल्या ईशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडून त्यांना सामाजिक, नैतिक आणि आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. हे षडयंत्र बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी बाधक असल्याने जातीय विषमता मोडीत काढण्यासाठी संघटित होणे काळाची ...

ठळक मुद्देनागेश चौधरी यांचे प्रतिपादन : देसाईगंजात कुणबी समाजाचा मेळावा

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : मानवाच्या निर्मितीत जातीयवादाला कुठेही थारा नसताना व्यवसायाच्या आधारावर जातीय व्यवस्था निर्माण करुन बहुजनांना भावनेचे गुलाम बनवून आपल्या ईशाऱ्यावर नाचण्यास भाग पाडून त्यांना सामाजिक, नैतिक आणि आर्थिक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. हे षडयंत्र बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी बाधक असल्याने जातीय विषमता मोडीत काढण्यासाठी संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विचारवंत नागेश चौधरी यांनी केले.देसाईगंज येथील हटवार मंगल कार्यालयात कुणबी-ओबीसी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागेश चौधरी बोलत होते. मेळाव्याला देसाईगंज न.प.च्या नगराध्यक्षा शालू दंडवते, ब्रह्मपुरीच्या सहायक पोलीस निरीक्षक देवयानी पारधी नाकतोडे, वैज्ञानिक पंकज रामजी धोटे, प्रा. दामू शिंगाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.मार्गदर्शन करताना चौधरी पुढे म्हणाले की, या देशातील बहुजन समाज कष्टकरी, कामगार वर्गात विखुरल्या गेला आहे. या वर्गातील बहुसंख्य नागरिक व त्यांची पाल्ये शिकुच नयेत, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. मंडल आयोग, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. या देशातील बहुजन समाजाला जागृतीच्या प्रवाहात येऊच नये यासाठी विरोधी संघटना सक्रिय आहेत. त्यांच्या संघटित षडयंत्रामुळेच देशातील असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचे भयाणक वास्तव आहे. तरीही बहुजन समाज मानवतेच्या आधारावर संघटित न होता जातियवादाच्या राजकारणात विखुरल्या जात आहे, ही बहुजन समाजासाठी धोक्याची घंटा असुन नोकरी मिळते म्हणून शिकु नका तर न्याय हक्काने अधिकार मिळवण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाजात पर्यायाने देशात समतेवर आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी जातीय विषमता मोडीत काढून मानवतेच्या आधारावर लढा उभा करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रदीप तुपट, प्रास्ताविक नरेश चौधरी, आभार दिलीप नाकाडे यांनी मानले.